आरोग्यासाठी गूळ उत्तम असून, त्याची लोकप्रियता वाढवण्यासाठी आधुनिक उत्पादने बाजारात आणणे आवश्यक आहे. आधुनिक उत्पादनामध्ये गुळाचे छोटे घन, द्रवरूप गूळ किंवा भुकटी यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. गुळाच्या भुकटीचेही विविध पदार्थाच्या साह्याने मूल्यवर्धन करणे शक्य आहे. उसाच्या रसापासून कोणत्याही रसायनाच्या वापराशिवाय गूळ निर्मितीची प्रक्रिया करणे शक्य आहे. उसाच्या रसापासून नैसर्गिक गोडवा आणणाऱ्या या पदार्थाची प्रामुख्याने निर्मिती होत असली तरी नारळ, पाल्मेरीया, खजूर, सॅगोपाम (Caryota urens L.) अशा काही अन्य झाडांच्या रसापासूनही गुळाची निर्मिती जगभरामध्ये होत असते. उसाच्या रसामध्ये उपलब्ध असलेल्या सर्व खनिज द्रव्ये आणि जीवनसत्त्वे गुळामध्ये उपलब्ध असतात. ही पोषक द्रव्ये विषारी घटकांना आणि कर्करोगकारक घटकांना प्रतिरोध करणारी आहेत. त्यामुळे आरोग्यदायी गोडवा आणणाऱ्या पदार्थांमध्ये यांचा समावेश होतो. भारतामध्ये एकूण उत्पादीत होणाऱ्या उसापैकी ५३ टक्के पांढऱ्या साखरेच्या निर्मितीसाठी, तर ३६ टक्के ऊस हा गूळ आणि खांडसरी निर्मितीसाठी, तर केवळ तीन टक्के ऊस रस किंवा खाण्यासाठी वापरला जातो. ८ टक्के ऊस पुन्हा बेण्यासाठी वापरला जातो. एकूण जागतिक गूळ उत्पादनाच्या ७० टक्के उत्पादन हे केवळ भारतामध्ये होते. मात्र, असे असूनही गूळ उत्पादन व्यवसाय सध्या नुकसानीमध्ये असल्याचे या उद्योजकांचे मत आहे. गेल्या काही वर्षांमध्ये आरोग्याप्रति जागरुकता वाढत असल्याने साखरेच्या तुलनेमध्ये गुळाला मागणी वाढत आहे. अर्थात, त्यासाठी आधुनिक गूळ उत्पादन आणि पॅकेजिंगकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. गुळाचे आरोग्यासाठीचे फायदे ः
पोषक घटक ः
आधुनिक गूळ उत्पादने पूर्वी ग्रामीण भागामध्ये गुळाचा मोठ्या प्रमाणात वापर होत असे. मात्र, अलीकडे वाढत्या शहरीकरणामुळे त्याचे प्रमाण वेगाने कमी झाले आहे. ग्रामीण भागाप्रमाणेच शहरामध्येही गुळाची आधुनिक उत्पादने आधुनिक पॅकेजिंगसह बाजारात उतरवणे आवश्यक आहे. त्यासाठी भारतीय कृषी संशोधक परिषदेच्या भारतीय ऊस संशोधन संस्थेमध्ये तीन प्रकारचे गूळ विकसित करण्यात आले आहेत. त्यांना स्थानिक बाजारपेठेप्रमाणेच निर्यातीसाठीही उत्तम संधी उपलब्ध होऊ शकतात. गूळ क्युब्स (घन आकार) गाळलेल्या ऊस रसाचे पंपिग तिहेरी पॅन फर्नेसमध्ये ठेवलेल्या उघड्या पॅनमध्ये केले जाते. त्याला उष्णता दिलील जाते. उष्णता देण्यासाठी सामान्यतः बगॅसचा वापर केला जातो. रस उकळत असताना त्यात स्वच्छतेसाठी वनस्पतीजन्य घटक ( रानभेंडी (देओला) रस प्रमाण ४५ ग्रॅम प्रति १०० किलो रस) मिसळला जातो. त्यामुळे रसातील अशुद्धीकारक घटक वर येतात. ते काढून टाकल्यानंतर राहिलेल्या रसाचा पर्यायाने गुळाचा रंग हलका व चांगला मिळतो. या उकलेला रस आवश्यक त्या आकाराच्या साच्यामध्ये भरला जातो. द्रवरूप गूळ (काकवी)
गूळ भुकटी गूळ भुकटी बनवण्याची पद्धती वरील प्रमाणेच असून, तयार झालेली तीव्र स्लरी ही लाकडी स्कॅपरवर घासली जाते. त्यामुळे त्याचे दाणे पडतात. हे दाण्याच्या आकारातील गूळ थंड करून चाळले जातात. उत्तम दर्जाच्या गूळ स्फटिकांचा आकार हा ३ मि.मी. पेक्षा लहान असावा. चुन्याच्या साह्याने ऊस रसाचा सामू ६ ते ६.२ पर्यंत वाढवला जातो. त्याचे तापमान १२० अंश सेल्सिअस पर्यंत पोचताच त्यातून उत्तम दर्जाची गुळ भुकटी तयार होते. त्यामध्ये सुक्रोजचे प्रमाणे ८८.६ टक्के असून, आर्द्रतेचे प्रमाण १.६५ टक्के इतके कमी असते. त्याचा रंग, स्फटिकांचा आकार उत्तम मिळतो. पुढे सूर्यप्रकाशामध्ये ठेवून त्यातील आर्द्रतेचे प्रमाण २ टक्के पेक्षा कमी ठेवले जाते. त्यानंतर त्याचे पॅकेजिंग पॉलिइथिलीन पॉलिस्टर पिशव्या किंवा बाटल्यामध्ये करावे. योग्य रीतीने पॅकिंग केलेली गूळ भुकटी दोन वर्षापेक्षा अधिक काळ साठवणे शक्य होते. अगदी मॉन्सूनच्या काळातही त्यांची साठवण अत्यंत कमी फरकासह शक्य होते. गूळ भुकटीचा रंग सोनेरी पिवळा ते सोनेरी गडद तपकिरी (डार्क चॉकलेट) प्रमाणे मिळू शकतो. गुळाचे मूल्यवर्धन
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.