लातूर जिल्ह्यातील (ता. उदगीर) भागवत केंद्रे या युवकाला अभियांत्रिकीचे शिक्षण अर्धवट सोडावे लागले असले तरी शेती व शेतीपूरक व्यवसायात भक्कम प्रक्रिया व विक्री व्यवस्थापन साध्य केले. उदगीर व लातूर येथे ‘माझा किसान’ नावाने स्वतःच्या ब्रँडअंतर्गत एकाच छताखाली रसवंती, भाजीपाला, फळे, धान्ये, दूध, गूळ, काकवी आदी बाबी उपलब्ध केल्या आहेत. स्वतःच्या शेतीमालासोबतच शेतकऱ्यांनाही योग्य दर व ग्राहकांचे घरपोच शेतीमाल पोचवत आहेत. यातून गावातील ३२ तरुणांना वर्षभर रोजगार उपलब्ध झाला आहे. भागवत यांना प्रगतिशील शेतीचा वारसा वडील शिवाजी केंद्रे यांच्याकडून मिळाला आहे. मात्र, केवळ उत्पादन घेऊनच न थांबता शेतीमालाच्या विक्रीची व्यवस्था उभारत भागवत यांनी पुढील पाऊल टाकले आहे. त्यात स्वतःच्या शेतीमालासह गावातील अनेक शेतकऱ्यांचा शेतीमाल खरेदी करून विक्रीची सोय केली. त्यांच्या उद्योजकतेचा श्रीगणेशा झाला रसवंतीगृहापासून. पुढे भाजीपाला व दूध विक्री सुरू केली. रसवंतीची सुरुवात भागवत केंद्रे यांच्या शेतात २० एकर ऊस लागवड असते. त्यापैकी चार एकर प्रयोग म्हणून नैसर्गिक पद्धतीचा अवलंब केला. यावर प्रक्रिया व विक्री म्हणून २०१४ मध्ये उदगीर येथील किसान नावाने रसवंतीगृह सुरू केले. नैसर्गिक पद्धतीने उत्पादित केलेल्या चार एकरपैकी तीन एकर ऊस रसवंतीसाठी वापरतात. सेंद्रिय उसापासून व बर्फविरहित चवदार रसामुळे किसान रसवंती लोकप्रिय झाली. मग हुरुप येऊन भागवत यांनी उदगीर येथे पाच व लातूर येथे एक अशी सहा रसवंतीगृहे सुरू केली. सहाही रसवंती गृहांवर ग्राहकांची दिवसभर गर्दी दिसते. रसवंतीचा ताळेबंद (प्रति महिना) ः रसवंतीसाठी को ९१०१० या वाणाच्या उसाची लागवड केली आहे. रोज पहाटे सहा रसवंतीसाठी सात ते आठ क्विंटल उसाची तोडणी करून वाहनाद्वारे सहाही रसवंतीगृहांवर पोचवला जातो. प्रत्येक रसवंतीवर गावातील तिघांना पगारावर नोकरीला ठेवले आहे.
भाजीपाला विक्री व्यवसाय ः
भाजीपाला विक्रीचा ताळेबंद ः
दूध व्यवसाय रसवंती व भाजीपाला विक्रीबरोबर २०१४ मध्ये चार गाई व तीन म्हशी विकत घेत दूध व्यवसायही सुरू केला. चांगला प्रतिसाद मिळाल्याने आठ देशी गाई व दहा म्हशीपर्यंत जनावरांची संख्या वाढली आहे. जनावरांच्या चाऱ्यासाठी अर्धा एकर क्षेत्रात वर्षभर टप्प्याटप्प्याने मका लागवड करतात. २०१८ मध्ये सुसज्ज असा गोठा बांधला. खर्च व उत्पन्न –
‘माझा किसान’ शेतकरी कंपनी
मूल्यवर्धन
कुटुंबाची मदत महत्त्वाची भागवत सांगतात, माझे वडील शिवाजी केंद्रे यांनी शेतीत खूप कष्ट घेत आम्हा चौघा भाऊ बहिणींना शिकवले. स्वतःच्या पायावर उभे केले. अभियांत्रिकी सोडून रसवंती सुरू करण्याच्या कल्पनेतही माझ्या पाठीशी राहिले. मी विक्रीसाठी नियोजन करत असताना त्या त्या बाबी शेतात पिकवण्याची जबाबदारी घेतली. गावातील शेतकऱ्यांनाही विश्वासात घेत माझ्या व्यवसायवाढीसाठी सतत मदत केली. मोठे बंधू बालाजी हे ठाणे येथे शिक्षक असून, त्यांचीही विविध प्रकारे मदत होते. इथे मिळेल ताजा रस व भाजीपाला
यशाची सूत्रे –
जिल्हा परिषद शाळेचे रुपडे बदलले आपल्या गावातील मुलांना चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी २०१८ मध्ये गावातील जिल्हा परिषद शाळेला ई-लर्निंग साहित्य, प्रोजेक्टर, आरओ शुद्धीकरण, शाळेची रंगरंगोटी व शैक्षणिक सॉफ्टवेअर अशा सुविधा उपलब्ध केल्या. यासाठी तीन लाख रुपये खर्च आला. मात्र, त्यांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कुमठा खुर्दसारख्या खेडेगावातही चिमुकल्यांना एखाद्या प्रगत शाळेप्रमाणे शिक्षण मिळत आहे.
पाच वर्षापासून रसवंती आणि साधारण दोन वर्षापासून भाजीपाला विक्रीमध्ये चांगला जम बसला आहे. सध्या मी केवळ ‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वावर भाजीपाला विक्री सुरू असून, अधिक ग्राहकापर्यंत पोचण्याचे ध्येय ठेवले आहे. ‘माझा किसान’ कंपनीच्या माध्यमातून उदगीर येथील एक हजार ग्राहकांना घरपोच दूध, भाजीपाला, फळे, धान्य पोचण्याचे लक्ष्य आहे. यातून १०० बेरोजगारांना काम, ५० शेतकरी व महिला बचत गटांना काम पुरवण्याचे ठरवले आहे. - भागवत केंद्रे, ९९६०१३४६६६ - बालाजी केंद्रे (बंधू), ९८५०३०८८९९
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.