ओळखा जनावरांतील परजिवींचा प्रादुर्भाव ...

ओळखा जनावरांतील परजिवींचा प्रादुर्भाव ...
ओळखा जनावरांतील परजिवींचा प्रादुर्भाव ...

सध्याचा उन्हाळा आणि त्यानंतर येणारा पावसाळा लक्षात घेऊन परजिवींच्या प्रादुर्भावाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. परजिवींचा प्रादुर्भाव ओळखून वेळेवर उपाययोजना करणे फायदेशीर ठरते. उन्हाळ्यामध्ये ज्या भागात सिंचनाची व्यवस्था नाही तेथे जंताचा प्रादुर्भाव दिसत नाही. परंतु, येत्या काळात सुरू होणाऱ्या पावसाळ्यामध्ये जंताचा प्रादुर्भाव वाढू शकतो. हे लक्षात घेऊन प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे गरजेचे आहे. या उपाययोजना करा ... १) जंताचा प्रादुर्भाव पावसाळी हंगामात कमी होण्यासाठी चरावयाच्या कुरणावरील व्यवस्था प्रभावी केल्यास जंत तसेच गोचीडांची लागण कमी होते. यासाठी सोपा उपाय म्हणजे चरावयाच्या कुरणातील पडक नांगरावी. २) चरावयाचे क्षेत्र पिकाखाली आणि पिकाखालील क्षेत्र हे चराऊ क्षेत्र अशी अदलाबदल करावी. या बदलामुळेदेखील जंत, गोचिडांचा प्रादुर्भाव कमी होतो. ३) पाण्याचा प्रादुर्भाव असल्याने साचलेले डबक्‍यातील किंवा खाच खळग्यातील पाणी जनावरे पितात. अशा वेळेस तेथे गोगलगायींची संख्या जास्त असल्यास पर्ण कृमीजन्य आजार प्रसारित होतात. हे लक्षात घेऊन जनावरांना पिण्यासाठी स्वच्छ पाण्याची सोय करावी. ४) गोठा पत्र्याचा असेल, हवा खेळती नसेल तर गोठ्याच्या पत्र्यावर हरीकेन वायूविजन यंत्र बसवावे. यामुळे बाह्य परजिवीचा प्रादुर्भाव कमी होतो. शक्‍यतो जनावरांसाठी मुक्तसंचार गोठा पद्धतीचा अवलंब करावा. विशेषतः ही काळजी उन्हाळी हंगामात घ्यावी. ५) गोठ्याच्या परिसरातील असलेल्या नाल्या स्वच्छ कराव्यात. यामुळे त्यात पाणी साचणार नाही. डास तसेच चावणाऱ्या माश्‍यांचा प्रादुर्भाव कमी होतो. ६) शेणाचा खड्डा खोल करून त्यात टाकलेले शेण बाहेर येणार नाही याची काळजी घ्यावी. खड्डा गोलाकार असावा. उन्हाळा, पावसाळी हंगामात खड्‌ड्यात शेण टाकल्यानंतर त्यावर पॉलिथी कागदाचे आवरण घालावे. यामुळे जनावरास चावणाऱ्या लायपरोझीया माश्‍यांचा प्रादुर्भाव टाळता येतो. या माश्‍या जनावरांच्या शरीरावर राहतात. ही माशी जनावरांचा चावा घेऊन रक्त शोषण करते. म्हणून उकिरडा व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचे आहे. ७) विशेषतः कोकणासारख्या भागामध्ये दमट हवामान असल्याने पिसवांचा प्रादुर्भाव उन्हाळ्यातही जाणवतो. म्हणून गोठा कोरडा ठेवावा. गोठ्यातील जळमटे काढावीत. निंबोळी अर्क (५ टक्के) याची फवारणी करावी. हे करू नका ः १. ज्या ठिकाणी सिंचन कमी असून उन्हाळ्यामध्ये पडक, गवत, कुरण किंवा हिरवा चारा अजिबात उपलब्ध नाही अशा ठिकाणी गवताद्वारे होणाऱ्या जंताचा प्रादुर्भाव मेंढी, शेळी तसेच इतर जनावरांना होत नाही. म्हणून अशा भागांतील जनावरांना उन्हाळ्यामध्ये जंतनाशकाची मात्रा देण्याची गरज नाही. यामुळे खर्चामध्ये बचत करता येते. ज्या प्रक्षेत्रावर उन्हाळ्यामध्ये देखील हिरवे कुरण चरण्यासाठी उपलब्ध आहे तेथील जनावरांना जंतनाशकाची मात्रा देण्याची आवश्‍यकता आहे. २. गाभण जनावरांना अलबेन्डॅझॉल या जंतनाशकाची मात्रा देण्याचे टाळावे. कारण गर्भपात होण्याची शक्यता असते. संपर्क ः डॉ. बाबासाहेब नरळदकर, ९४०३८४७७६४ ( पशुवैद्यकीय महाविद्यालय, परभणी)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com