स्मार्ट तंत्रज्ञानाने मेंदू बथ्थड होत नाही...

आधुनिक तंत्रज्ञानामुळे माणूस बथ्थड, मूर्ख होत जाणार असल्याचा दावा अनेकांकडून केला जातो. याच गृहीतकांचा नेमकेपणाने अभ्यास सिनसिनाटी विद्यापीठातील सामाजिक व वर्तनशास्त्रविषयक संशोधक अॅन्थोनी कॅमेरो यांनी टोरोंटो विद्यापीठातील रोटमॅन्स व्यवस्थापन विद्यालयातील सहकाऱ्यांसह केला आहे.
स्मार्ट तंत्रज्ञानाने मेंदू बथ्थड होत नाही...
स्मार्ट तंत्रज्ञानाने मेंदू बथ्थड होत नाही...

आधुनिक तंत्रज्ञानामुळे माणूस बथ्थड, मूर्ख होत जाणार असल्याचा दावा अनेकांकडून केला जातो. याच गृहीतकांचा नेमकेपणाने अभ्यास सिनसिनाटी विद्यापीठातील सामाजिक व वर्तनशास्त्रविषयक संशोधक अॅन्थोनी कॅमेरो यांनी टोरोंटो विद्यापीठातील रोटमॅन्स व्यवस्थापन विद्यालयातील सहकाऱ्यांसह केला आहे. त्याचे निष्कर्ष ‘नेचर ह्यूमन बिहेव्हिअर’मध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत. स्मार्ट तंत्रज्ञानाचे अनेक वाईट बाजू सातत्याने समोर येत आहेत. छोट्या मोठ्या गोष्टींसाठी डिजिटल तंत्रावर विसंबून राहण्याचे प्रमाणही अतोनात वाढले आहे. या साऱ्या गोष्टीमुळे माणूस आळशी होत चालला आहे. त्यामुळे मानवी मेंदूसह जैविक बाबींवर त्याचे विपरीत परिणाम होत असल्याचे दावे अनेक जण करत आहेत. त्याविषयी माहिती देताना अॅन्थोनी कॅमेरो म्हणाले, की स्मार्ट फोन आणि डिजिटल तंत्रज्ञानाचे माणसांच्या जैविक आणि मेंदूच्या पातळीवर होणाऱ्या विपरीत परिणामांच्या सातत्याने हेडलाइन होत असल्या, तरी त्याला कोणताही शास्त्रीय आधार किंवा पुरावा मिळाला नाही. उलट एकाच वेळी अनेक गोष्टीकडे लक्ष देण्याची बाब ही जैविक आकलन क्षमतेमध्ये वाढ करणारी ठरत आहे. आता पूर्वीप्रमाणे फोननंबर पाठ करण्याची आवश्यकता राहिलेली नाही. किंवा गुंतागुंतीची गणिते सोडविण्यासाठी पाढे पाठ करण्याची आवश्यकता कमी झाली आहे. यामुळे कोणालाही आवश्यक फोन किंवा पाढे पाठ नाहीत, म्हणून बथ्थड म्हणता येणार नाही. उलट हा वेळ वेगळ्या आणि अधिक उपयुक्त अशा बाबींवर खर्च करू शकतो. पूर्वी तुम्हाला रस्ते लक्षात ठेवावे लागत. आता तेच काम तुमचा स्मार्ट फोन जीपीएस प्रणालीच्या साह्याने करतो. तुम्हाला ज्या ठिकाणी जायचे आहे, त्याचा सर्वांत जवळचा आणि कमी रहदारी असलेला मार्गही तो सुचवितो. त्यामुळे प्रवासातही रस्त्याकडे लक्ष ठेवण्यापेक्षा अधिक उपयुक्त किंवा उत्पादक कामांवर लक्ष केंद्रित करणे शक्य आहे. या अर्थाने होत असलेले बदल मेंदू व विचार प्रक्रियेसाठी अधिक चांगले ठरू शकतील. नुसत्या मानवी मेंदूच्या साह्याने कोणतेही काम करण्यामध्ये अनेक मर्यादा आहेत. माहिती साठवणे आणि ऐनवेळी शोधणे ही एकच बाब पाहिली तरी त्यात संगणक व डिजिटल साधनांचे वर्चस्व लक्षात येते. मात्र याच साधनांच्या सोबतीने मानवी मेंदू अत्यंत गुंतागुंतीची कामे सहजतेने करू शकतो. हे लक्षात ठेवले पाहिजे. संगणक, टॅब्लेट आणि स्मार्ट फोन ही साधने आपल्यासाठी स्मरण, गणन, माहिती साठवणे आणि योग्य प्रकारे मांडणे यासाठी मदत करत आहेत.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com