कोल्हापूर येथील निसर्ग मित्र परिवार संस्थेने बंदिस्त सौर ऊर्जा वाळवणी यंत्र (ड्रायर) विकसित केले आहे. वाया जाणाऱ्या किंवा टाकाऊ नाशवंत शेतमालावर अशा पद्धतीने प्रक्रिया होऊन त्याचा पुनर्वापर करणे या तंत्रज्ञानामुळे शक्य होणार आहे. विशेष म्हणजे कमी खर्चात हे तंत्रज्ञान उपलब्ध करण्याचा संस्थेचा विचार आहे. भाजीपाला, फळे, धान्ये अशा सर्व प्रकारांची वाळवणी या यंत्राद्वारे शक्य झाली आहे. कोल्हापूर येथील निसर्ग मित्र परिवार संस्था पर्यावरण विषयात १९८२ पासून कार्यरत आहे. प्रसिद्ध वनस्पतीतज्ज्ञ डॉ. मधुकर बाचूळकर हे संस्थेचे अध्यक्ष आहेत. संस्थेचे सुमारे २०० सदस्य असून ते नोकरी, व्यवसाय सांभाळून संस्थेच्या उद्दीष्ट कार्यासाठी आपला वेळ देतात. पराग केमकर हे यापैकीच एक संस्थेचे सदस्य आहेत. ते इलेक्ट्रॉनिक इंजिनीअर आहेत. वाया जाणारा किंवा टाकाऊ शेतमाल पुन्हा उपयोगात आणण्यासाठी त्यांनी आपले शिक्षण व बुद्धीकौशल्य वापरून ड्रायरची (शेतमाल वाळवणी यंत्र) निर्मिती केली आहे. यंत्राच्या विविध चाचण्या झाल्या असून त्या यशस्वी झाल्या आहेत. असा प्रक्रियायुक्त माल टिकावू स्वरूपात ठेवणे व गरजेनुसार त्याची विक्री करणे सुलभ होणार आहे. असे आहे सौर ऊर्जा शेतीमाल वाळवणी यंत्र
रचना
यंत्राची वैशिष्ट्ये
वापरलेली विद्युत प्रणाली
वाळविता येणारा शेतमाल
असे चालते वाळवणीचे कार्य
शेतकरी हेच मुख्य उद्दीष्ट्य संस्थेचे तंत्रज्ञ केमकर म्हणाले, की यंत्राची निर्मिती करताना शेतकरी हाच घटक केंद्रस्थानी ठेवला आहे. त्याचा वाया जाणारा शेतमाल या यंत्राच्या माध्यमातून उपयोगात आला तर त्याचा आर्थिक फायदा त्याला घेता येईल. यंत्राची रचना करताना त्यासाठी लागणारे सुट्टे भाग बाजारातून आणले आहेत. त्याचा ढाचा तयार केला. त्याच्या चाचण्या यशस्वी झाल्या आहेत याचे मोठे समाधान आम्हाला आहे. हे यंत्र शेतकऱ्यांना तसेच प्रक्रिया उद्योजकांना नक्कीच उपयोगी ठरेल असा विश्वास आहे. विक्री करणे हा आमच्या संस्थेचा उद्देश नाही. इच्छुकांनी आमच्याशी संपर्क साधल्यास त्यांना हे तंत्रज्ञान पुरवणे शक्य होईल. प्रायोगिक तत्त्वावर यंत्र तयार केल्याने त्याचा खर्च तीस हजार रुपयांपर्यंत आला आहे. मात्र, व्यावसायिक स्तरावर उत्पादन सुरू केल्यास हा खर्च २२ हजार रुपयांपर्यंतही कमी होऊ शकतो असे केमकर यांनी सांगितले. पावडरनिर्मिती फायदेशीर आम्ही अनेक बाजारपेठांमध्ये प्रत्यक्ष फिरलो. बाजार संपल्यानंतर ज्या शेतकऱ्यांकडे कोथिंबीर किंवा तत्सम भाज्यांच्या पेंढ्या शिल्लक आहेत त्या विकत घेतल्या. त्यापासून पावडरी तयार केल्या. अशा प्रकारचा व्यवसाय निश्चित फायदेशीर ठरू शकतो. या प्रकल्पात संस्थेचे अध्यक्ष डॉ. मधुकर बाचुळकर यांच्यासह अन्य सहकाऱ्यांनीही मदत केली आहे, असे संस्थेचे सदस्य अनिल चौगुले यांनी सांगितले. पराग केमकर- ९१४५६८२५४४ अनिल चौगुले- ९४२३८५८७११
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.