भाजीपाला पिकांमध्ये भेंडी पिकाची लागवड वाढत आहे. काही वर्षांत फुलगळ व फळगळ ही समस्या शेतकऱ्यांना जाणवत आहे. ती थांबवण्यासाठी भेंडीची वेळेवर लागवड करणे आवश्यक आहे. गत वर्षी भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यात उन्हाळी हंगामातील भेंडीमध्ये फुलगळ व फळगळ होऊन उत्पादनामध्ये ७५ टक्क्यापर्यंत घट आली होती. या बाबींचे गांभीर्य लक्षात घेऊन शेतकऱ्यांशी झालेल्या चर्चेमध्ये खालील बाबी लक्षात आल्या.
शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांच्या शेतावर प्रत्यक्ष भेट दिली असता भेंडीला अधिक दर मिळण्याच्या आशेने भेंडीची पेरणी रब्बी हंगामात (म्हणजे ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यांत केली होती. या महिन्यामध्ये थंडीची तीव्रता जास्त आणि अधिक काळ टिकून राहिल्यामुळे झाडांची अन्नद्रव्य शोषून घेण्याची क्षमता मंदावली. परिणामी मोठ्या प्रमाणावर फुलगळ झाली. हे लक्षात घेता भेंडीची लागवड करताना योग्य वेळी करणे आवश्यक आहे.
संपर्क ः ०७१८६-२३६३४३ (कृषि विज्ञान केंद्र, साकोली, जि. भंडारा.)
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.