राज्यामध्ये अनेक भागांत सध्या दुष्काळी वातावरण असून, सिंचनासाठी पाण्याची कमतरता भासत आहे. भविष्यामध्ये सातत्याने उद्भवणाऱ्या अशा परिस्थितीचा सामना करण्यासाठी पाण्याचा कार्यक्षम वापर करण्याची आवश्यकता आहे. यासाठी नियमन तूट सिंचन हे तंत्रज्ञान उपयुक्त ठरू शकते.
पृ थ्वीचा ७० टक्के पृष्ठभाग पाण्याने व्यापलेला असला तरी त्यातील केवळ २.५ टक्के पाणी गोडे आहे. गोड्या पाण्यापैकी दोन तृतीयांशपेक्षा अधिक पाणी कृषी क्षेत्राच्या सिंचनासाठी वापरले जाते. मात्र, गोड्या पाण्यासाठी अन्य क्षेत्रासाठीचा संघर्ष वाढत आहे. यामुळे सर्व क्षेत्रात पाण्याच्या बचतीसाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता वाढत आहे. कृषी क्षेत्रात नियमन तूट सिंचन हे पाण्याची बचत आणि वापर कार्यक्षमता सुधारण्यासाठी ओळखले जाते. या पद्धतीत वाढीच्या विशिष्ठ कालावधीदरम्यान नियमन तूट सिंचनाद्वारे पाण्याचा सौम्य तणाव तयार केला जातो. त्यामुळे पिकांच्या वनस्पतीमध्ये शारीरिक व जैव-रासायनिक गुणधर्मांत सकारात्मक सुधारणा होते. पिकांच्या उत्पादनावर किमान परिणामासह २० ते ३० टक्यांपर्यंत सिंचनाचे पाणी वाचविणे शक्य होते. पाणी वापर कार्यक्षमता वाढते. संकल्पना
नियमन तूट सिंचन (Regulated Deficit Irrigation-RDI) या प्रक्रियेमध्ये पीक पद्धतीमध्ये शास्त्रीय पद्धतीने आवश्यकतेपेक्षा कमी सिंचन केले जाते. पिकाचा पाणीपुरवठा कमाल पातळीच्याखाली कमी केला जातो. पिकाला सौम्य ताण दिलाजातो. या ताणास वनस्पती सकारात्मक प्रकारे प्रतिसाद देतात. ही प्रक्रिया पिकाच्या विशिष्ट वाढ अवस्थेत राबवली जाते. यामुळे उत्पादनामध्ये किंचित घट झाली तरी पाण्याची मोठी बचत साध्य होते. हे शिल्लक राहिलेले पाणी अन्य पिकांसाठी वापरता येते.
वनस्पतींच्या प्रतिसादाचे तत्त्व
शेतात वापरायची पद्धत
नियमन तूट सिंचन पद्धती वापरण्याचे मार्ग (१) वाढीच्या अवस्थांवर आधारित तूट सिंचन (२) आंशिक मुळे-क्षेत्र तूट सिंचन (३) उप-पृष्ठभाग ठिबक सिंचन. यातील आंशिक मुळे-क्षेत्र तूट सिंचन सर्वात लोकप्रिय आणि परिणामकारक असून, पीक उत्पादनावर किमान परिणामांसह २० ते ३० टक्यांपर्यंत पाणी वाचवता येते.
सिंचनाची योग्य पद्धत
पिकांच्या वाढीच्या अवस्था कायीक/वनस्पतिजन्य वाढ आणि पिकण्याची अवस्था पाणी तणावास कमी संवेदनशील असते. या वाढीच्या अवस्था तूट सिंचनासाठी योग्य आहेत. फुलोरा, उत्पादन निर्मिती या वाढीच्या अवस्था पाण्यासाठी अधिक संवेदनाक्षम असतात. या अवस्थांमध्ये सिंचनाच्या पाण्यात कपात करता येत नाही.
नियमन तूट सिंचनाच्या यशस्वितेसाठी
जोखीम
एक नावीन्यपूर्ण दृष्टिकोन दुष्काळी स्थितीचा संभाव्य अंदाज असताना सिंचनासाठी ही पद्धत अत्यंत उपयुक्त ठरू शकते. त्यातून पाण्याचा कार्यक्षम वापर, बचत आणि उत्पादनामध्ये स्थिरता मिळवणे शक्य आहेत. या दरम्यान पाण्याच्या तणावासाठी पिकांमध्ये प्रतिसाद नियंत्रण करणाऱ्या भौतिक तसेच जैविक प्रक्रिया उत्तम प्रकारे समजून घेणे आणि संशोधन गरजेचे आहे.
- डॉ. गोविंद जाधव, ९८९०९५४२३१ (माजी संचालक, विस्तार शिक्षण विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी.)
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.