निंबूत (जि. पुणे) येथील दीपक आणि गणेश या जगताप बंधूंनी अत्यंत मन लावून, कष्टपूर्वक, ध्यास व अभ्यासातून दुष्काळी माळरानावर अंजीर बागेचे नंदनवन फुलवले आहे. लागवडीपासून ते मार्केटिंगपर्यंत चोख व्यवस्थापन ठेवत दर्जेदार अंजिरासाठी खात्रीशीर बाजारपेठही उभारली आहे. कुटुंबातील सर्व सदस्यांनी शेतीत एकमेकांना साथ देत कर्तृत्वाच्या जोरावर आर्थिक व सामाजिक प्रगतीही साधली आहे. पुणे जिल्ह्यातील निंबूत (ता. बारामती) येथील दीपक व गणेश या जगताप बंधूंची एकूण दहा एकर शेती आहे. पैकी चार एकरांत ऊस, सहा एकरांत अंजीर आहे. त्यांच्या आजोबांनी दुष्काळी भागात टेकडीवर जमीन खरेदी केली होती. काटेरी झाडे, मोठमोठे दगड गोटे काढून २००३ मध्ये चार एकरांचे सपाटीकरण केले. त्यात भाजीपाला घेण्यास सुरुवात केली. सन २००९ मध्ये प्रत्येकी एक एकरांत डाळिंब, संत्रा आणि अंजीर यांची लागवड केली. संत्रा पिकाला हवामान मानवले नाही. बाजारपेठही मिळाली नाही. डाळिंबाचे उत्पादन चांगले आले, मात्र तेलकट डाग व मर रोगावर नियंत्रण ठेवता आले नाही. अंजीर मात्र किफायतशीर ठरले. आजगायत जगताप कुटुंबाचे हेच मुख्य पीक ठरले आहे.
अंजीर बागेची शेती
लागवड टप्पे व झाडे
उत्पादन
माळरानावर आणले पाणी
वीर धरणाच्या कालव्याजवळल जमिनीत असलेल्या विहिरीमधून दोन किलोमीटरवरील डोंगर माळरानावर पाणी आणले. अंजीर बागेजवळच्या बोअरवेलचाही उपयोग होतो. ठिबक सिंचन पद्धती आहे. मात्र, दीपक म्हणतात, की मुरमाड रानाला ठिबकपेक्षा प्रवाही पद्धतीने पाणी देणे अधिक फायदेशीर ठरते. फळे काढणीस सुरुवात झाली की अधिक पाणी द्यावे लागते.
खट्टा, मिठा दोन्ही बहार
खट्टा आणि मिठा अशा दोन्ही बहारात उत्पादन घेतले जाते. सध्या खट्टा बहाराच्या फळांची विक्री सुरू आहे. छाटणीपूर्वी एक ते दीड महिना पाणी बंद करून बागेला ताण दिला जातो. या बहारात अंजिरांना गोडी कमी असते. चार महिने पावसाळा असल्याने बागेला धोका अधिक असतो. तांबेरा, करपा आणि थ्रीप्स यांच्या प्रादुर्भावाचा धोका असतो. मात्र, या बहरात चांगले दर मिळतात. मिठा बहारातील फळांना गोडी जास्त असते. उत्पादन जास्त येत असले, तरी दर तुलनेने कमी असतात.
कोल्हापूर, सांगली बाजारपेठ
सकाळी सात वाजता तोडणी सुरू होते. घरची माणसे आणि चार ते पाच मजुरांच्या साहाय्याने दुपारी एक वाजेपर्यंत ती पूर्ण होते. मोठी, छोटी, उकलेली अशी मालाची प्रतवारी होते. दररोज सायंकाळी ५०० ते ७००, ८०० किलोपर्यंत अंजीरे नीरा (ता. पुरंदर) स्थानकावरून रेल्वेने कोल्हापूर, मिरज, सांगलीला रवाना केली जातात. व्यापाऱ्यांना १४ किलोच्या पाटीमध्ये माल द्यावा लागतो. पाटीसाठी ३५ रुपये खर्च येतो. मात्र, ती व्यापाऱ्यांकडून परत मिळते. दर वर्षी ८०० पाट्या विकत घ्याव्या लागतात. पुणे, मुंबईला दोन किलोचे पॅकिंग पाठवावे लागते. त्यामुळे मजूर जास्त लागतात. त्याचा खर्च वाढतो. लहान, उकललेल्या फळांचे प्रमाण कमी असून, त्यांची रेल्वे स्थानक आणि स्थानिक बाजारात विक्री होते.
मिळणारे दर
व्यवस्थापनातील मुद्दे
बंगल्यापर्यंत प्रवास
आई सुमन, वडील विनायक, चार बहिणी, दोघे भाऊ, असे आठ जणांचे कुटुंब पूर्वी छपराच्या छोट्या घरात राहायचे. आर्थिक विवंचना प्रचंड जाणवायची. कष्टपूर्वक ध्यास, अभ्यासातून यशस्वी केलेल्या अंजीर पिकाने आता आर्थिक सक्षमता दिली आहे. आता हे कुटुंब बंगल्यात राहते. गणेश यांची पत्नी सौ. धनश्री, तर दीपक यांची पत्नी सौ. नीलम यादेखील शेतीत राबतात. सर्वांची एकी हेच यशाचे गमक ठरले आहे.
दीपक जगताप- ९७६३४३७४०७
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.