ग्रामस्वच्छतेचा मंत्र प्रत्यक्षात साकारलेली यमाजी पाटलाची वाडी

अठरा वर्षांपासून आम्ही ग्रामस्वच्छता अभियानात सहभाग घेत आहोत.गावातील सर्वांचे सहकार्य लाभते. या वर्षी जिल्ह्यात संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात यश मिळवले. आता विभागीय स्तरावर यश मिळविण्यासाठी झोकून काम करत आहोत. सामूहिक निर्णणातूनच सर्व निर्णय घेतले जातात. -सौ. गोदावरी मोहन चव्हाण सरपंच, यमाजी पाटलाचीवाडी ९११९४९४१२२
-ग्रामस्थांना ओला कचरा आणि सुका कचरा यांचे वर्गीकरण करण्यासाठी देण्यात आलेली कचराकुंडी
-ग्रामस्थांना ओला कचरा आणि सुका कचरा यांचे वर्गीकरण करण्यासाठी देण्यात आलेली कचराकुंडी

स्वच्छतेचा ध्यास मनाशी बाळगून सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्‍यातील यमाजी पाटलाची वाडी हे गाव समृद्ध झाले आहे. ग्रामस्वच्छता अभियानात गावाने वेगळे स्थान निर्माण केले आहे. संत गाडगेबाबा यांच्या श्रमदानाची शिकवण गाव अठरा वर्षांपासून जपते आहे. एकीच्या बळाची ताकद गावाने दाखवून दिली आहे. सांगली जिल्ह्यात आटपाडी तालुक्‍यातील यमाजी पाटलाची वाडी हे सुमारे २७६ कुटुंबांचे १७६३ लोकसंख्या असलेले गाव. ग्रामपंचायतीची स्थापना १९७५ मध्ये झाली. त्यानंतर सुमारे २० वर्षे ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली. मग खंड पडून पंचवार्षिक निवडणूक झाली. पुन्हा गावकऱ्यांनी निवडणूक बिनविरोध करण्याचा ध्यास घेतला. त्यानुसार आजमितीस आठ वर्षे निवडणूक बिनविरोध झाली आहे. ग्रामविकासाचे ध्येय बाळगले सन २००१-०२ पासून गावाने स्वच्छतेकडून समृद्धीकडे जाण्याचा ध्यास घेतला. ग्रामस्वच्छता अभियानात जिल्ह्यात प्रथम आलेल्या या गावाने विभागीय स्पर्धेत यशासाठी कंबर कसली आहे. गेल्या अठरा वर्षांपासून गाव ग्रामस्वच्छता अभियानात सहभागी होते आहे. यासाठी तरुणांसह ज्येष्ठांनीही पुढाकार घेतला. श्रमदानातून दररोज स्वच्छता केली जाते. संत गाडगेबाबा यांची श्रमदानाची शिकवण गावाने अठरा वर्षे जपली आहे. प्रत्येक घर आपले गाव ‘स्मार्ट’ ठेवण्यासाठी आपला वाटा उचलत आहे. साऱ्या गावाचे श्रमदान गावात सिद्धनाथाचे मंदिर आहे. तिथे पहाटे पाच वाजता ग्रामस्थ एकत्र येतात. पूजा झाल्यानंतर हाती झाडू, खराटा घेवूऊन स्वच्छतेला सुरवात होते. हाक दिल्यावर सारा गाव एकवटतो. कोपरा ना कोपरा स्वच्छ करण्याचे काम सुरू होते. मुलीच्या जन्माचे स्वागत मुलगी शिकली प्रगती झाली, हीच संकल्पना डोळ्यासमोर ठेवून आटपाडी येथील विजय व संदीप गायकवाड या बंधूंनी वैशिष्ट्यपूर्ण योजना राबविली आहे. गावात जन्म झालेल्या मुलीच्या माता-पित्यांना पाच हजार रुपये देऊन मुलगी झाल्याचे स्वागत त्याद्वारे केले जाते. गावकऱ्यांनी दिली शाळेला जागा जिल्हा परिषद प्राथमिक शाळाही गुणवत्तापूर्ण झाली आहे. यामुळे शाळेच्या पटसंख्येत वाढ होऊ लागली आहे. मुलांना शिक्षणाबरोबर आरोग्याचे धडे दिले जातात. शाळेमार्फत सांस्कृतिक कार्यक्रम होतात. यामुळे पहिली इयत्तेपासून विद्यार्थ्यांना कलेला वाव मिळतो आहे. खेळण्यासाठी जागेची असलेली अडचण शिक्षकांनी गावकऱ्यांसमोर मांडली. त्यानुसार शाळेमागील दहा गुंठे जागा शाळेला विकत देण्यात आली. गावाची वैशिष्ट्ये

  • दररोज सकाळी ग्रामस्थांकडून गावात स्वच्छता
  • प्रत्येक ठिकाणी स्वच्छतेचे फलक
  • घरोघरी स्वच्छतेची दिली जाते माहिती
  • शाळेला आयएसअो नामांकन. शाळा ‘स्मार्ट’ बनली आहे.
  • गावातील सुका कचरा गोळा करून त्याची विल्हेवाट लावण्यासाठी घनकचरा समिती गांडूळखत प्रकल्प उभारत आहेत.
  • शिवाजी विद्यापीठाने आटपाटी येथील बाबासाहेब देशमुख महाविद्यालयांतर्गत पाच वर्षे गाव दत्तक घेतले आहे.
  • राष्ट्रीय सेवा योजनेंतर्गत रस्त्यांची कामे पूर्ण
  • जिल्हा परिषद शाळेच्या वर्गात संगणक, डिजिटल सुविधा
  • प्रत्येक घराच्या परसबागेत वृक्षारोपण
  • अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना शिक्षण मार्गदर्शन
  • शुद्ध पाणी देण्यासाठी एटीएमचा वापर
  • संपूर्ण गाव गटारमुक्त. शोषखड्ड्यांचा वापर.
  • युवा शक्ती संघटनेतर्फे विविध सांस्कृतीक कार्यक्रमांचे आयोजन
  • -या माध्यमातून वृक्षारोपण, पाणीपुरवठा करण्यास तांत्रिक अडचण आल्यास टॅंकरने पुरवठा.
  • -लोकवर्गणीसाठी जिल्हा परिषदेचे २०००७-०८ पासून स्वतंत्र बचत खाते
  • -जिल्हा परिषद शाळेत सांस्कृतीक कार्यकमातून सुमारे एक लाख वर्गणी
  • -विद्यार्थ्यांना दप्तर, पुस्तके, वह्या, आदींचे वाटप
  • देशपातळीवर नावलौकिक मिळवण्याचे उद्दिष्ट गाव स्वच्छ व सुंदर होण्यासाठी समिती नेमली आहे. शौचालय व्यवस्थापन, सांडपाणी, घनकचरा, पाणी गुणवत्ता व व्यवस्थापन, घर व गाव स्वच्छता, वैयक्तिक स्वच्छता, स्मार्ट व्हिलेज संकल्पनेनुसार कामकाज, सामाजिक एकता लोकसहभाग, वैयक्तिक व सामूहिक पुढाकारातून विविध उपक्रम चालवले जात आहेत. देशपातळीवर स्वच्छतेचा नावलौकिक मिळवायचे उद्दिष्ट ग्रामस्थांनी ठेवले आहे. प्रतिक्रिया स्वच्छता स्वतःच्या घरापासून केली तरच गाव स्वच्छ होते. हाच ध्यास डोळ्यासमोर ठेवून गावकऱ्यांनी स्वच्छतेला प्रारंभ केला आहे. याचमुळे गाव समृद्ध झाल्याचा आम्हाला अभिमान आहे. -गणपती विठ्ठल चव्हाण ग्रामस्थ क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांनी तालुक्‍याला योगदान दिले. त्यांच्या तत्त्वावर आम्ही चालतो. महत्वाचे निर्णय ग्रामसभेत घेतले जातात. -दत्तात्रय भोसले, ग्रामस्थ ९४२०६६२१९९ गावाचे शाळेसाठी मोलाचे योगदान आहे. शिक्षकांनी मागील दहा वर्षांत अविरत परिश्रम घेतले. त्यामुळे शाळेचा जिल्ह्यात नावलौकिक झाला आहे. भविष्यात गुणवत्तेवर अजून लक्ष केंद्रित करण्याचा मानस आहे. -शरद नारायण चव्हाण मुख्याध्यापक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ९५४५८४४५४०  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com