कठोरा (ता. जि. जळगाव) येथील अल्पभूधारक शेतकरी सुनील नारायण पाटील खरिपात कापसाची मुख्य लागवड करतात. कूपनलिका असल्याने पूर्वहंगामी लागवडीवर भर असतो. काळी कसदार जमीन असल्याने पाण्याचा नियंत्रित वापर होतोच, शिवाय जमीन कडक होऊन तिचे आरोग्य बिघडू नये यासाठी शेणखताचा वापरही करतात. माझी पाच एकर शेती आहे. कूपनलिकेला मुबलक पाणी असते. जमीन काळी कसदार असून तीन एकर जमीन भाडेतत्त्वावर करताे. कापूस प्रमुख पीक असून पूर्वहंगामी बीटी कापसाची लागवड करतो. मात्र हंगामाला सुरुवात होताना बियाणेटंचाई, खत टंचाई असे प्रश्न भेडसावतात. आवश्यक बियाणे बाजारात मिळत नाही. मग एकाच वाणाची अपेक्षा न करता विविध वाण आणतो. कमी कालावधीत येणाऱ्या वाणांची निवड करतो. खतांमध्ये युरियाची समस्या अनेकदा असते. कठोरा गाव जळगाव शहरापासून सुमारे ३० किलोमीटरवर अाहे. वाहतूक खर्च वाढतो. मजुरांचीही समस्या अधिक असते. म्हणून रासायनिक खतांचा कमी वापर करतो. शेती व्यवस्थापनाला महत्त्व
संपर्क : सुनील पाटील, ९७६३९४५६९२
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.