पीक लागवडीची अचूक वेळ साधणे महत्त्वाचे
अशोक बारहाते यांची ९ एकर शेती. मात्र खरीपात मजूरटंचाई, भांडवलाची कमी उपलब्धता व पावसाच्या लहरीपणामुळे पाणी टंचाई आदी समस्यांचा दरवर्षी सामना करावा लागत होता. अखेर त्यांनी यांत्रिकीकरण ,मजुरांचा आवश्यकतेनूसार वापर व पिकनियोजन यांचा समन्वय साधून या समस्यांवर मात केली. जाणवणाऱ्या समस्या दर वर्षी खरीप हंगामात मजूरटंचाई ही मुख्य समस्या बनत आहे. पाणीटंचाई, पाऊस वेळेवर न पडणे, भांडवलाची योग्य वेळी उपलब्धता या समस्या तर आहेतच. त्याचप्रमाणे रासायनिक खते व कीडनाशकांवरील खर्चात दर वर्षी वाढ होत आहे. भांडवलासाठी बहुतांश वेळी सहकारी संस्था व राष्ट्रीयीकृत बॅंकांकडून पुरेसे कर्ज उपलब्ध होत नाही. खासगी सावकाराकडून पैसे घेऊन भांडवल उभे करावे लागते.
खरिपातील कामाचे नियोजन खरिपामध्ये कांदे, टोमॅटो, मूग, बाजरी यांसह हंगामी भाजीपाला पिकांचे नियोजन असते. उन्हाळ्यात पूर्ण शेताची नांगरणी करून, मे महिन्यात एकरी ४ ट्रॅक्टर शेणखत टाकून घेतो. आमच्याकडे २ ट्रॅक्टर आहेत. त्यापैकी ४५ हॉर्सपॉवर व दुसरा २५ हॉर्सपॉवर क्षमतेचा आहे. मशागत आणि फवारणी या साह्याने केली जाते. शेणखत मजुरांच्या साह्याने पसरून, रोटाव्हेटरने पुन्हा मशागत केली जाते. पाऊस पडण्यापूर्वी ट्रॅक्टरच्या फणाने मशागत केली जाते. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दीड एकर क्षेत्रावर टोमॅटो लागवडीचे नियोजन आहे. त्यासाठी गादीवाफे करून त्यावर मल्चिंग पेपर व इन लाइन ठिबक याचा वापर करतो. टोमॅटोची लागवड, बांधणी, खते देणे, विद्राव्य खते, पीक संरक्षण या सगळ्यांसाठी मजूर मोठ्या प्रमाणावर लागतात. टोमॅटो लागवड झाल्यानंतर १ महिन्याने १ एकर क्षेत्रावर फ्लॉवर लागवड करण्याचे नियोजन आहे.
संपर्क : अशोक राघो बारहाते, ७५८८०३७६६४
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.