महाविकास आघाडीची समन्वय समिती होणार स्थापन

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

मुंबई  ः राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाच वर्षे टिकण्यासाठी प्रथमच तीन पक्षांच्या केंद्रीय नेत्यांची समन्वय समिती लवकरच स्थापन केली जाणार असल्याचे समजते.  

राज्यात शिवसेनेच्या नेतृत्वाखाली काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्याने, अनेक नेत्यांच्या विधानांमुळे उलटसुलट चर्चांमुळे राजकीय फड रंगत आहे. त्यामुळे हे वादविवाद टाळण्याबरोबरच सरकार पाच वर्षे टिकण्यासाठी केंद्रीय स्तरावरील समन्वय समिती स्थापन होणार आहे. या समन्वय समितीची बैठक प्रत्येक महिन्यात होणार असून, सरकारच्या कामांचा आढावा ही समिती घेईल.

सरकारमधील अंतर्गत वादाचे विषय असतील तर ते समितीच्या बैठकीत चर्चिले जातील आणि त्यातच निर्णय होईल. या विषयांवर तिन्ही पक्षांच्या कोणत्याही नेत्याला बोलण्यास मज्जाव असेल. त्याचबरोबर पक्षाची स्वतंत्र भूमिका मांडण्याची जबाबदारी पक्षाच्या एका नेत्याकडे असेल, त्यामुळे कोणतेही वादविवाद होणार नाहीत, असा निर्णय तिन्ही पक्षांच्या प्रमुखांनी घेतल्याचे समजते.    समितीत असतील हे नेते काँग्रेसचे अहमद पटेल आणि मल्लिकार्जुन खर्गे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल, शिवसेनेकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि खासदार अनिल देसाई या समितीत असतील असे सांगण्यात  आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com