नुकसानग्रस्तांना हेक्टरी ५० हजार रूपयांची भरपाई देण्याची मागणी

औरंगाबाद : अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना एक तर विमा कंपनीकडून संपूर्ण नुकसानभरपाई द्यावी किंवा केंद्र व राज्य सरकारने हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत करावी, अशी मागणी राष्ट्रीय किसान परिषदेचे अध्यक्ष अशोक पाटील हुड यांनी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर आणि राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांच्याकडे ई-मेलद्वारे केली आहे.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

औरंगाबाद  : अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना एक तर विमा कंपनीकडून संपूर्ण नुकसानभरपाई द्यावी किंवा केंद्र व राज्य सरकारने हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत करावी, अशी मागणी राष्ट्रीय किसान परिषदेचे अध्यक्ष अशोक पाटील हुड यांनी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर आणि राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांच्याकडे ई-मेलद्वारे केली आहे.

या निवेदनानुसार, ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर मार्केट बंद आहेत. यामुळे नाशवंत फळांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यात द्राक्षे, संत्रा, मोसंबी, आंबा, टरबूज, केळी आदी फळबागांचे ५० टक्के नुकसान झाले असताना, अवकाळी पावसामुळे शिल्लक असलेला माल वाया जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना खूप मोठा तोटा सहन करावा लागणार आहे. लॉकडाऊननंतर अन्य नागरिकांचे जनजीवन सुरळीत होईल. परंतु, नुकसान झालेले शेतकरी वर्षभर काहीच करू शकणार नाही.

कोरोना व अवकाळी पाऊस या दोन्ही आपत्तींच्या वेळी पीक विमा कंपनी फक्त ११, ७०० रूपये देत बोळवण करून मोकळी होणार आहे. केंद्र सरकार दोन हजार रूपये देणार आहे; परंतु ते कधी खात्यात जमा होणार अन त्यात होणार तरी काय, असा सवाल राष्ट्रीय किसान परिषदेने केला आहे. दोन हजारांऐवजी कृषी व्यवस्था कशी सुरळीत राहिल याकडे लक्ष देण्याचे आवाहन श्री. हूड यांनी केले आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com