पुणे ः ‘कोरोना’चा शिक्षण क्षेत्रावर गंभीर परिणाम होत आहे. सद्यःस्थितीत कृषी पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा आॅनलाइन घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थी आॅनलाइनच्या नावाखाली भरडले जातील. त्यामुळे सरकाराने व कृषी विद्यापीठांनी या परीक्षेचा पुर्नविचार करावा, अशी मागणी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, कृषिमंत्री दादा भुसे, कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्याकडे ई-मेलव्दारे निवेदन पाठवून कृषी पदवीधर सागर कारंडे यांच्यासह अन्य विद्यार्थ्यांनी केली आहे.
सध्या जग ‘कोरोना’चा सामना करत आहे. आपल्या देशात व विशेषतः महाराष्ट्रात रूग्ण संख्या व एकूणच परिस्थिती गंभीर आहे. त्यात सरकारने व कृषी विद्यापीठांनी आॅनलाइन परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, ऑनलाइन परीक्षेतील त्रुटींचा विद्यार्थ्यांवर गंभीर परिणाम होईल. त्यामुळे कृषी पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या संभाव्य ऑनलाइन परीक्षा टाळून विदयार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्याबद्दल सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी कृषी पदवीधर विद्यार्थ्यांनी केली आहे. कृषी पदवीधर विद्यार्थ्यांचे म्हणणे असे...
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.