कृषी पदव्युत्तरच्या ऑनलाइन परीक्षेचा पुनर्विचार करण्याची विद्यार्थ्यांची मागणी

पुणे ः ‘कोरोना’चा शिक्षण क्षेत्रावर गंभीर परिणाम होत आहे. सद्यःस्थितीत कृषी पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा आॅनलाइन घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थी आॅनलाइनच्या नावाखाली भरडले जातील. त्यामुळे सरकाराने व कृषी विद्यापीठांनी या परीक्षेचा पुर्नविचार करावा, अशी मागणी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, कृषिमंत्री दादा भुसे, कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्याकडे ई-मेलव्दारे निवेदन पाठवून कृषी पदवीधर सागर कारंडे यांच्यासह अन्य विद्यार्थ्यांनी केली आहे.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे  ः ‘कोरोना’चा शिक्षण क्षेत्रावर गंभीर परिणाम होत आहे. सद्यःस्थितीत कृषी पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा आॅनलाइन घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थी आॅनलाइनच्या नावाखाली भरडले जातील. त्यामुळे सरकाराने व कृषी विद्यापीठांनी या परीक्षेचा पुर्नविचार करावा, अशी मागणी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, कृषिमंत्री दादा भुसे, कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्याकडे ई-मेलव्दारे निवेदन पाठवून कृषी पदवीधर सागर कारंडे यांच्यासह अन्य विद्यार्थ्यांनी केली आहे.

सध्या जग ‘कोरोना’चा सामना करत आहे. आपल्या देशात व विशेषतः महाराष्ट्रात रूग्ण संख्या व एकूणच परिस्थिती गंभीर आहे. त्यात सरकारने व कृषी विद्यापीठांनी आॅनलाइन परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, ऑनलाइन परीक्षेतील त्रुटींचा विद्यार्थ्यांवर गंभीर परिणाम होईल. त्यामुळे कृषी पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या संभाव्य ऑनलाइन परीक्षा टाळून विदयार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्याबद्दल सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी कृषी पदवीधर विद्यार्थ्यांनी केली आहे.   कृषी पदवीधर विद्यार्थ्यांचे म्हणणे असे...

  • परीक्षा रद्द कराव्या ही मागणी नाही. तर लॉकडाउननंतर सुरक्षित वातावरणात परीक्षा घ्याव्यात.
  • विद्यार्थी आॅनलाइन परीक्षेच्या विरोधात आहेत
  • देशाच्या कानाकोपऱ्यात पुरेशी इंटरनेट सुविधा उपलब्ध नाही. देशात ३६ व महाराष्ट्रात ४३ टक्के लोकांकडे इंटरनेट सुविधा उपलब्ध आहे, म्हणून आॅनलाइन परीक्षा विद्यार्थ्यांसाठी हितावह नाहीत.
  • २३ मार्चपासून देशव्यापी लाॅकडाउनमुळे शैक्षणिक संस्था बंद आहेत. अभ्यासक्रमाची साधी ओळख पण विद्यार्थ्यांना नाही.
  • ऑनलाइन शिक्षण हा फार्स आहे.
  • विद्यापीठ प्रशासन शासनाची दिशाभूल करत आहे, जे विद्यार्थ्यांसाठी नुकसानकारक ठरू शकते
  • पदव्युत्तर शिक्षण संदर्भ ग्रंथांशिवाय अशक्य आहे.सध्या विदयार्थ्यांकडे संदर्भ ग्रंथ उपलब्ध नाहीत.
  • ऑनलाइन परीक्षेमुळे काही विद्यार्थ्यांना साधनांअभावी परीक्षा देणे शक्य नाही. त्यामुळे एकूण गुणतालिकेवर परिणाम होऊन संबंधित विद्यार्थ्यांना पीएचडी प्रवेश मिळणे अवघड होईल.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com