रासायनिक खते प्रत्येक वेळी सेंद्रिय खतांमध्ये मिसळून दिल्यास या खतांची उपयुक्तता वाढते. उभ्या पिकात खते देताना जमिनीत वापसा असावा. रासायनिक खते दिल्यानंतर लगेच पाणी देऊ नये शक्यतो दुसऱ्या दिवशी हलके पाणी द्यावे.
सुरु उसाचा कालावधी १२ महिन्यांचा असल्यामुळे ऊस तोडणी १५ फेब्रुवारीच्या आत होते. त्यामुळे खोडवा उत्तम ठेवता येतो. खोडवा ठेवायचा नसल्यास जमिनीची मशागत करून जमिनीला चार महिने ऊन मिळते. या जमिनीमध्ये खरीप व रब्बी पिके घेऊन पुन्हा सुरू उसाची लागवड करता येते. यामुळे पिकांची चांगली फेरपालट होऊन जमिनीचे भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्म सुधारून सुपीकता राखता येते. सुरु लागवड १५ फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करावी. यानंतर लागवड झाल्यास जादा तापमानामुळे खोड किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर आढळतो, पर्यायाने उत्पादनही घटते. लागवडीसाठी जास्त साखर उतारा आणि उत्पादन देणाऱ्या को ८६०३२ (नीरा), व्हीएसआय ४३४, कोसा ६७१, एमएस १०००१ आणि व्हीएसआय ०८००५ या जातींची निवड करावी.
सेंद्रिय खतांचा वापर
एकरी ५ टन चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत रोटाव्हेटरच्या साहाय्याने जमिनीत चांगले मिसळून घ्यावे. त्यानंतर लागणी अगोदर एकरी ५ टन शेणखत आणि रासायनिक खताचा पहिला हप्ता सरीमध्ये मातीत मिसळावा. शेणखत किंवा कंपोस्ट खत पुरेसे नसल्यास प्रेसमड केक, कोंबडी खत, बायोकंपोस्ट, उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या पेंडी अशा अनेक पर्यायांनी जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थ मिसळता येतात. याचबरोबरीने ताग किंवा धैंचा ही हिरवळीची पिके फायदेशीर ठरतात.
रासायनिक खतांचा वापर
- ०२०- २६९०२२७८
(वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, मांजरी (बु.), पुणे)
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.