सध्याच्या काळात हवामानामध्ये बदल होत आहेत. या बदलामुळे द्राक्ष बागेत भुरी आणि डाऊनी रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेऊन नियंत्रणासाठी योग्य उपाययोजना कराव्यात.
गेल्या दोन-तीन दिवसांपासून पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे द्राक्ष बागेत अडचणी तयार झाल्या आहेत. सतत ढगाळ वातावरण, मध्येच पडणारा पाऊस यामुळे तापमानात बदल होत आहे. या बदलामुळे द्राक्ष बागेमध्ये भुरी आणि केवडा रोगाच्या वाढीसाठी पूरक वातावरण तयार झाले आहे. पावसानंतर थंडी वाढण्याची शक्यता, तसेच वातावरण कोरडे राहण्याची शक्यता आहे. यामुळे भुरीच्या प्रादुर्भावाचा धोका वाढू शकतो.
भुरी नियंत्रण
केवडा (डाऊनी) नियंत्रण
फळकूज नियंत्रण अवकाळी पावसामुळे नाशिक, निफाड, दिंडोरी, सिन्नर, ओझर या भागांमध्ये द्राक्ष घडांमध्ये पाणी साठून फळकूज होण्याची शक्यता आहे. अशा बागांमध्ये मिनरल ऑइल २ मिलि प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ज्या ठिकाणी थोडीशी रिमझिम आहे अशा ठिकाणी ट्रायकोडर्मा ठिबकद्वारे (२ ते ३ लिटर प्रति एकर) द्यावे किंवा द्राक्ष घडांवर फवारणी (५ मिलि प्रति लिटर पाणी) केल्यास फायद्याचे होऊ शकेल.
- ०२०-२६९५६०३२ (राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, जि. पुणे)
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.