पॅकेजिंगमुळे भाजीपाला हाताळण्यास सोपा जातो.त्यामुळे टिकवण क्षमता वाढवून भाजीपाला योग्य त्या ठिकाणी पाठवता येतो.साठवणुकीच्या पद्धतीचा भाजीपाल्याचा पोत, टिकवण क्षमता, रंग आणि गुणवत्तेवर परिणाम होतो.
साठवणुकीचे नियोजन भाजीपाला थंड करणे : उष्णता निघून जाण्यासाठी भाजीपाला थंड करणे फार गरजेचे असते. भाजीपाला वेगवेगळ्या पद्धतीने थंड केला जातो. थंड केल्यामुळे भाजीपाल्याचा रंग, पोत, चव टिकून राहते, तसेच श्वसन क्रिया मंदावते, आतील पाण्याचा नाश कमी होतो, इथिलीनची निर्मिती कमी होते, भाजीपाला कुजण्याची क्रिया मंदावते. पॅकेजिंग : पॅकेजिंगचा भाजीपाल्याच्या टिकवण क्षमतेवर फार मोठा परिणाम दिसून येतो. जर एखाद्या पॅकेटमध्ये कमी गुणवत्तेचा माल असेल, तर तो एका पॅकेटमधून दुसऱ्य पॅकेटला लागतो. जर पॅकेजिंग चांगले असेल तर असे होत नाही. पॅकेजिंगमुळे श्वसन क्रिया मंदावते, भाजीपाला हाताळण्यास सोपा जातो.त्यामुळे टिकवण क्षमता वाढवून भाजीपाला योग्य त्या ठिकाणी पाठवता येतो. साठवणूक : साठवणुकीच्या पद्धतीचा भाजीपाल्याचा पोत, टिकवण क्षमता, रंग यावर परिणाम होतो. साठवणुकीच्या वेळेस जर श्वसन क्रिया कमी असेल, आर्द्रता जास्त असेल तर भाजीपाला सुकत नाही. बहुतेक भाजीपाला साठवणुकीसाठी ८० ते ९० टक्के आर्द्रता लागते.
- डॉ. संजूला भावर, ८६००३४४०९७ (विषय विशेषज्ञ (उद्यानविद्या), कृषी विज्ञान केंद्र,खामगाव,जि.बीड)
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.