कराड तालुक्यात महापुरातील नुकसानग्रस्त पाणी योजना वाऱ्यावरच

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

कऱ्हाड, जि. सातारा  ः अतिवृष्टी व महापुराचा तालुक्‍यातील अनेक गावांच्या पाणी योजनांना फटका बसला. त्यात तालुक्‍यातील १५ गावांच्या पाणी योजनांचे नुकसान झाले. त्याच्या भरपाईसाठी शासनाकडे सुमारे पाऊण कोटींची मागणी करण्यात आली आहे. मात्र अद्यापही संबंधित गावांना निधीची प्रतीक्षाच आहे. यातील बहुतेक गावांतील योजना तत्काळ सुरू करण्यात आल्या असल्या, तरी योजनांचे काम करण्यासाठी निधीची प्रतीक्षा आहे. सर्वाधिक नुकसान कार्वेतील योजनेचे झाले असून, त्यासाठी ३९ लाख ४४ हजारांची आवश्‍यकता आहे.  

अतिवृष्टी व धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे जुलै, ऑगस्टमध्ये तालुक्‍यातील नद्यांना महापूर आला. त्याचा सर्वाधिक फटका नदीकाठच्या गावांना बसला. शेतीसह जमीन, पाणी योजनांचे मोठे नुकसान झाले. यात शेती पंपासह पिण्याच्या पाणी योजेनांही फटका सोसावा लागला. कऱ्हाड तालुक्‍यातील सुमारे १५ गावांतील पाणी योजनांना त्याचा फटका बसला आहे. पंचायत समितीच्या पाणी पुरवठा विभागाने त्याचा सर्व्हे करून नुकसानीचा प्रस्ताव तयार केला आहे. या सर्व्हेनुसार तालुक्‍यातील म्होप्रे, केसे, पाडळी, साजूर, शिरवडे, टाळगाव, पोतले, रेठरे बुद्रुक, कार्वे, गोटे, बनवडी, कापील, गोवारे, कोरेगाव व भवानवाडी आदी गावांतील पाणी योजनांचे अतिवृष्टी व पुराने मोठे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी नदीपात्र बदलल्याने योजनांचे नुकसान झाले आहे. त्याबाबत शासनाकडे प्रस्ताव पाठवूनही अद्यान निधी मिळालेला नाही. त्यामुळे शासनाकडून निधी केव्हा येणार व कामे मार्गी लागणार याबाबत उत्सुकता आहे.

पुरानंतर झालेल्या विधानसभा निवडणुका व त्यानंतर राज्यात सत्तास्थापनेला लागलेल्या विलंबामुळे निधीस अडथळा आल्याचे सांगितले जात आहे. मात्र राज्यात शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येत महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले आहे. त्यामुळे या योजनांना नव्या सरकारकडून निधी मिळेल, अशी आशा आहे. 

या गावांना आहे निधीची प्रतीक्षा कऱ्हाड तालुक्‍यातील म्होप्रे पाणी योजनेचे तीन लाख, केसे व पाडळी येथील पाणी योजनांचे प्रत्येकी दोन लाख ५० हजार, साजूर योजनेचे सहा लाख, शिरवडे येथील योजनेचे दोन लाख ५३ हजार, टाळगाव योजनेचे दोन लाख ३६ हजार, पोतलेतील योजनेचे एक लाख १३ हजार, रेठरे बुद्रुक येथील योजनेचे एक लाख १३ हजार, कार्वेतील योजनेचे ३९ लाख ४४ हजार, गोटे येथील योजनेचे एक लाख ७० हजार, बनवडी येथील योजनेचे एक लाख ५७ हजार, कापिल योजनेचे चार लाख ६१ हजार, गोवारेतील योजनेचे एक लाख नऊ हजार, कोरेगाव येथील योजनेचे दोन लाख ३८ हजार, भवानवाडी येथील योजनेचे ६० हजारांचे नुकसान झाले आहे. या गावांना पाणी योजनादुरुस्तीसाठी निधीची प्रतीक्षा आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com