विधिमंडळात मांडला जाणारा प्रश्‍न ऐनवेळी मागे घेता येऊ नये : नाना पटोले

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

मुंबई : विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी बुधवारी (ता. ११) पुन्हा एकदा आपल्या अधिकारांचा उपयोग करत आमदारांच्या बेजबाबदार वर्तणुकीवर बडगा उगारला. सभागृहात ऐनवेळी प्रश्‍न मागे घेण्याच्या आमदारांच्या अधिकारावर श्री. पटोले यांनी चाप लावण्याची शिफारस केली आहे.

अनेक आमदार विधिमंडळात वेगवेगळ्या मार्गांनी प्रश्‍न उपस्थित करण्यासाठी प्रयत्न करतात. मात्र, प्रश्‍न विचारण्याच्या वेळी अचानक प्रश्‍न मागे घेतात. यामुळे खरोखर प्रश्‍न विचारण्याची इच्छा असणाऱ्या आमदारांवर अन्याय होतो, अशी स्पष्ट भूमिका श्री. पटोले यांनी घेतली. तसेच सभागृहाला प्रश्‍न मागे घेण्याची तरतूद रद्द करण्यासंबंधात शिफारस केली आहे.

श्री. पटोले म्हणाले, की विधिमंडळ सदस्यांनी उपस्थितीत केलेला प्रश्न ऐनवेळेला समाधान झाल्याचे सांगत मागे घेण्यात येतो. यासाठी विधिमंडळाच्या नियमावलीत नियम ८३ नुसार सदस्यांना प्रश्न मागे घेण्याचा अधिकार आहे. तशी कायदेशीर मुभा आमदारांना देण्यात आली आहे. मात्र, अनेकदा आमदार प्रश्न उपस्थित करण्याच्या वेळी हजर राहत नाहीत. त्यामुळे इतर सदस्यांच्या प्रश्नांवर अन्याय होतो. त्यामुळे नियम ८३ चा अधिकार रद्द करण्यात यावा. 

नाना पटोले यांच्या या शिफारशीला शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांनीही पाठिंबा दिला. काही सदस्य अशा नियमांच्या आड अधिकारांचा दुरुपयोग करतात, असे मत श्री. जाधव यांनी व्यक्त केले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही या शिफारशीचे स्वागत केले आहे. हा नियम रद्द करण्यासंदर्भात नियमावली समितीच्या सल्ल्याचा विचार करून निर्णय घ्यावा, असे मत श्री. फडणवीस यांनी व्यक्त केले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही कालानुरूप अशा नियमांबाबत विचार करणे गरजेचे असल्याचे म्हटले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com