भारतीय अन्न महामंडळाबाबतचा शांता कुमार समितीचा अहवाल पडून

भारतीय अन्न महामंडळ अर्थात ‘एफसीआय’ हे भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे केंद्र आहे. महामंडळाच्या बळकटीकरणासाठी आम्ही अहवाल दिले. मात्र, पुढे त्याचे काय झाले, याविषयी सांगता येणार नाही. - शांता कुमार, अध्यक्ष, केंद्रीय उच्चस्तरीय समिती.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे : भारतीय अन्न महामंडळाची (एफसीआय) उपयुक्तता तपासून बळकटीकरणाचे उपाय सूचविणारा शांता कुमार समितीचा अहवाल पडून आहे. त्यामुळे महामंडळातील मूलभूत सुधारणा लांबणीवर पडल्या आहेत.  

देशातील शेतकऱ्यांचा ‘एफसीआय’च्या कामकाजाशी अप्रत्यक्षपणे निकटचा संबंध येतो. गहू व तांदळाची किमान आधारभूत भावाने खरेदीची जबाबदारी ‘एफसीआय’कडे आहे. यात ९० टक्के शेतीमालाची खरेदी राज्य यंत्रणा करते. मात्र, देशात साठवण व वितरणाची जबाबदारी ‘एफसीआय’कडे आहे. स्वस्त धान्य वितरणव्यवस्थेसाठी ६० दशलक्ष टनांपेक्षा जास्त धान्य सरकारला हवे असते. त्यात ‘एफसीआय’ मोलाची भूमिका बजावते. केंद्राकडून लोकांना प्रतिकिलो तीन रुपयांत तांदूळ व दोन रुपयांत गहू दिला जातो. सरकारने या खर्चाचा अभ्यास केला. त्यात तांदळासाठी प्रतिकिलो ३० रुपये आणि गव्हावर २२ रुपये खर्च होत असल्याचे आढळले. यामुळे ‘एफसीआय’च्या उपयुक्ततेवरच प्रश्नचिन्ह लावले गेले आहे.

नियोजन आयोगाने २००५ मध्ये केलेल्या अभ्यासात सार्वजनिक वितरणव्यवस्थेत ५८ टक्के गळती होत असल्याचा धक्कादायक निष्कर्ष काढला. ‘‘शांता कुमार अहवालात ही गळती काही राज्यात ७० ते ९० टक्क्यांपर्यंत असल्याचे नमूद केले गेले आहे,’’ अशी माहिती सूत्रांनी दिली.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com