साखर कामगारांचा वेतन करार दीड वर्षांपासून प्रलंबित

कोल्हापूर: साखर साखर उद्योगात महत्त्वाच्या असणाऱ्या साखर कामगारांचा वेतन करार अद्यापही प्रलंबित आहे. दीड वर्षापूर्वी हा करार संपला आहे. कामगार संघटनांनी पाठपुरावा करुनही अद्याप याची दखल कोणत्याच पातळीवर घेतली गेलेली नाही.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

कोल्हापूर: साखर साखर उद्योगात महत्त्वाच्या असणाऱ्या साखर कामगारांचा वेतन करार अद्यापही प्रलंबित आहे. दीड वर्षापूर्वी हा करार संपला आहे. कामगार संघटनांनी तत्कालीन भाजप सरकारकडे याबाबतची मागणी केली होती. सध्याच्या महाविकास आघाडी सरकारकडेही याबाबत पाठपुरावा केला. परंतु, अद्यापही याची दखल कोणत्याच पातळीवर घेतली गेलेली नाही. यामुळे कामगारांमधून असंतोष व्यक्त होत आहे. एकीकडे साखर कामगारांची वेतनाची ५०० कोटींपेक्षा अधिक रक्कम कारखान्यांकडे थकीत आहे. यातच हा करार ही होत नसल्याने संघटना आक्रमक झाल्या आहेत.

गेल्या काही वर्षांत साखर कामगार हा घटक कारखान्यांकडून नेहमीच दुर्लक्षिला गेला आहे. राज्यातील ४० ते ४५ कारखान्यांचे तर पूर्ण वेतन थकले आहे. इतरांनी काही प्रमाणात तरी वेतन दिले आहे. यातच भरीस भर म्हणून हा करार करण्यासाठीची त्रिस्तरीय समिती अद्यापही स्थापन झालेली नाही. २१०४ ला झालेला वेतन करार मार्च २०१९ ला संपला. त्या नंतर मात्र शासनाचे या कराराकडे पूर्ण दुर्लक्ष झाले. भाजप सरकारला देखील समिती स्थापन करण्यात अपयश आले. सध्याचे महाविकास आघाडी सरकार अस्तिवात आल्यानंतर काही दिवसातच ‘कोरोना’चे संकट आल्याने या सरकारकडून ही फारसे प्रयत्न झाले नाही. 

या पार्श्वभूमीवर आगामी हंगाम येत आहे. अगोदरच कोरोनामुळे कामगारांची परिस्थिती प्रचंड बिकट बनली आहे. यातच करार होत नसल्याने कामगार अस्वस्थ आहेत. याचा विपरीत परिणाम येत्या गाळप हंगामावर निश्चित होईल अशी भीती कामगार संघटनांच्या सूत्रांनी व्यक्त केली. गेल्या वर्षी कामगारांनी साखर आयुक्तालयावर मोठा मोर्चा काढला होता. तरी देखील कार्यवाही झालेली नाही. यामुळे असंतोष खदखदत आहे.   माहिती मागवली जातेय प्रादेशिक साखर सहसंचालकांमार्फत साखर कारखान्यांकडून वेतन कराराबाबतची माहिती मागवली जात आहे. याला कारखानदार प्रतिनिधींनी दुजोरा दिला. मागील कराराची किती कारखान्यांनी अंमलबजावणी केली, याबाबतची माहिती मागवली जात आहे. कामगार संघटनांच्या समिती स्थापन करण्याचा मागणीच्या पार्श्वभूमीवर ही माहिती मागवली जात असल्याचे कारखानदार प्रतिनिधींनी सांगितले.  

प्रतिक्रिया

गेल्या दीड वर्षापासून साखर कामगारांचा वेतन करार झालेला नाही. याबाबत आम्ही सातत्याने मागील व आत्ताच्या सरकारकडे पाठपुरावा करीत आहोत, पण अद्याप प्रतिसाद नाही. यामुळे साखर कामगार अस्वस्थ आहेत. करार झाला नाही तर आंदोलन निश्चित आहे. - तात्यासाहेब काळे, अध्यक्ष,  राज्य साखर कामगार संघ.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com