
Pune News : भूमी अभिलेख विभागामार्फत जमिनीची मोजणी (Land Survey) करणाऱ्या भूकरमापक भरतीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. त्यामुळे येत्या मे महिन्यापासून १ हजार २५० भूकरमापक सेवेत रुजू होणार आहेत. या प्रक्रियेमुळे राज्यातील प्रलंबित जमीन मोजणीला वेग येणार आहे.
भूमी अभिलेख विभागांतर्गत जमिनींच्या मोजणीचे काम करण्यात येते. जमीन मोजणीचे काम करणाऱ्या भूकरमापकांची राज्यात पदे रिक्त आहेत. राज्यातील भूमी अभिलेख विभागात विविध प्रकारची एकूण चार हजार पदे आहेत.
त्यापैकी भूकरमापकांची दीड हजार पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांमुळे जमीन मोजणीच्या कामांना वेग येत नसल्याच्या तक्रारी करण्यात येत होत्या. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने भूकरमापकांची पदे भरण्याचे आदेश जारी केले होते.
त्यापैकी १ हजार २५० पदे भरण्यास सरकारने मान्यता दिली आहे. त्यानुसार गेल्या वर्षीच्या नोव्हेंबरमध्ये परीक्षाही घेतल्या होत्या. त्याचा निकालही जाहीर केला होता. आता
कागदपत्रांची छाननी होणार आहे. त्यात पात्र ठरणाऱ्या उमेदवारांची २१ एप्रिलनंतर अंतिम यादी जाहीर केली जाईल. त्यानुसार पात्र उमेदवारांना येत्या एक मे रोजी भूमी अभिलेख सेवेत दाखल करण्याचे नियुक्ती पत्र दिले जाईल, अशी माहिती भूमी अभिलेख विभागाने दिली.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.