
पुणे : चालू जानेवारी महिन्यात रब्बी हंगामासाठी (Rabi Season) धरणांतून पाण्याचे आवर्तन (Agriculture Irrigation) सोडण्यात आले असल्याने पाणीपातळीत (Water level) हळूहळू घट होत आहे.
वीस दिवसांत १६.२२ टीएमसी एवढ्या पाण्याचा वापर झाला आहे. उन्हाळ्यात पाण्याची मागणी वाढल्यास (Water Demand in Summer) साठ्यात आणखी घट होणार आहे. त्यासाठी जलसंपदा विभागाला (Department of Water Resources) आतापासूनच नियोजन करावे लागणार आहे.
जिल्ह्यात ३ जानेवापर्यंत जवळपास १९.९८ टीएमसी पाण्याचा वापर झाला होता. त्यावेळी जिल्ह्यातील २६ धरणांत एकूण १८२.६९ टीएमसी एवढा उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध होता.
त्यानंतर रब्बी हंगामातील गहू, हरभरा, मका, सूर्यफूल, ज्वारी अशा विविध पिकांसाठी जलसंपदा विभागाने शेतकऱ्यांची मागणी विचारात घेऊन टप्प्याटप्प्याने ११ धरणांतून पाण्याचे आवर्तन सोडले. त्यामुळे वेगाने धरणातील पाणीसाठा कमी झाला आहे.
सध्या पुणे जिल्ह्यातील खडकवासला, चासकमान, वीर, पिंपळगाव जोगे, येडगाव, डिंभे, घोड, विसापूर, उजनी या धरणांतून रब्बी हंगामासाठी कालव्याला पाण्याचे आर्तन सोडण्यात आले आहे.
यामध्ये खडकवासला धरणातून डाव्या व उजव्या कालव्याला १५०५ क्युसेक, चासकमान धरणातून ५५० क्युसेक, वीर २३७७, येडगाव १४००, डिंभे ८००, घोड ४७०, विसापूर ८०, उजनीतून १३४० क्युसेकने पाण्याचे आवर्तन सोडले आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.