Agriculture Department : राज्यात कृषी सहायकांची १७५७ पदे रिक्‍त

रिक्‍त पदांमुळे कृषी खात्याचा कारभार खिळखिळा झाला आहे. परिणामी शेतकऱ्यांना सेवा मिळण्यातही अडचणी येत असताना त्याच्याशी राज्यकर्त्यांना कोणतेच देणेघेणे नसल्याचे स्पष्ट होत आहे.
Agriculture Department
Agriculture DepartmentAgrowon

नागपूर ः रिक्‍त पदांमुळे (Vacant Post) कृषी खात्याचा (Agriculture Department) कारभार खिळखिळा झाला आहे. परिणामी शेतकऱ्यांना सेवा मिळण्यातही अडचणी येत असताना त्याच्याशी राज्यकर्त्यांना कोणतेच देणेघेणे नसल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळेच गेल्या चार वर्षांपासून साधी कृषिसेवकांची पदभरती देखील करण्यात आली नसल्याचे धक्‍कादायक वास्तव समोर आले आहे.

अमरावती येथे कृषिमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या पहिल्याच आढावा बैठकीत आमदार बच्चू कडू यांनी जिल्हा मुख्यालयी असलेल्या कृषी कार्यालयात कर्मचाऱ्यांना प्रतिनियुक्‍ती तसेच रिक्‍तपदांचा मुद्दा जोरकसपणे मांडला होता. त्याची दखल घेत कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी भरती करण्याबाबत सकारात्मक असल्याचे जाहीर केले. मात्र राज्यात रिक्‍तपदांमुळे परिस्थिती हाताबाहेर गेल्याची स्थिती आहे.

Agriculture Department
Agriculture Department : पदोन्नती रखडवल्याने आंदोलनाला सुरुवात

रिक्‍तपदांमुळे उपलब्ध कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढत असतानाच दुसरीकडे पदभरती होत नसल्याने बेरोजगारांमध्ये नैराश्‍य वाढत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१८ मध्ये कृषी सेवकांची भरती करण्यात आली होती.

त्यानंतर आकृतिबंध नसल्याचे कारणाआड आजवर भरतीला खो देण्यात आला आहे. २००९ साली कृषी विभागाचा आकृतिबंध तयार करण्यात आला होता.

Agriculture Department
Agriculture Department : पदोन्नतीच्या फाइलमधील पदे, बदली ठिकाणांमध्ये फेरफार?

नियमानुसार दर दहा वर्षांनी तो अपडेट करावा लागतो. परंतु १३ वर्षानंतरही ही प्रक्रिया राबविली गेली नाही. परिणामी कृषी सेवकांची भरती प्रक्रिया रखडली आहे. कृषी पदविकाधारक असलेल्या टाकळी देशमुख येथील कल्याण अंगदराव देशमुख यांनी राज्यातील कृषी सहायकाच्या मंजूर, रिक्‍तपदाची माहिती मंत्रालयाकडे मागितली होती. त्यानुसार त्याला मे-२०२२ पर्यंतच्या रिक्‍तपदाबाबत कळविण्यात आले आहे. त्यानुसार राज्यात सद्यःस्थितीत मजूर ११५९९ पदांपैकी ९८४२ पदे रिक्‍त आहेत.

तीन गावांसाठी एक कृषी सहायक राहतो. परंतू सध्या एका कृषी सहायकाकडे तब्बल बारा गावांची जबाबदारी आहे. त्यामुळे त्याला या पदाला न्याय देणे कसे शक्‍य होणार आहे? आकृतीबंधाच्याआड पदभरती केली जात नाही हे वास्तव आहे. त्यामुळे कृषी पदवीधरांमध्ये नैराश्‍य वाढत आहे. सध्याच्या सरकारने भरतीबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा. कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांना भेटून निवेदन दिले. त्यांनी सकारात्मक निर्णय घ्यावा.

- संदीप भावले, कृषी पदवीधर, औरंगाबाद

कृषी सहायकांच्या पदांची स्थिती

विभाग--मंजूर पदे--रिक्‍त पदे

कृषी आयुक्‍तालयात - १२ ः ००

पुणे- १७७९ ः २४९

कोल्हापूर - १२११ ः २१५

ठाणे - १२४४ ः २८८

नाशिक - १९४४ ः २८७

औरंगाबाद - ११२५ ः १३४

लातूर - १४६८ ः ९०

अमरावती ः १७७२ ः १४१

नागपूर ः १४९४ ः ३५३

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com