Crop Damage Compensation : मार्चमधील अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना १७७ कोटींची नुकसान भरपाई ; राज्य सरकारचा दिलासा

अवकाळीमुळे शेतीपिकांचे नुकसान झालेल्या राज्यातील शेतकऱ्यांना राज्य सरकारने दिलासा दिला आहे. राज्यात मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.
Crop Damage
Crop Damage Agrowon

Crop Damage Compensation अवकाळीमुळे (Unseasonal Rain) शेतीपिकांचे नुकसान झालेल्या राज्यातील शेतकऱ्यांना राज्य सरकारने दिलासा (Crop Damage Compensation) दिला आहे. राज्यात मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचे (Crop Damage) मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. अस्मानीच्या संकटाने ऐन काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला होता.

या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारकडून १७७ कोटी ८० लाख ६१ हजार रुपयांचा निधी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वितरित करण्यात आला आहे.

राज्यात मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे द्राक्ष, केळी, आंबा, संत्रा या फळबागांसह गहू, ज्वारी, हरभरा, कांदा आणि भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे आता हा निधी वितरिक केल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

अवकाळीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला तातडीने मदत देण्याच्या सुचना केल्या होत्या. त्यानुसार मार्चमधील नुकसानीसाठी सरकारने हा निधी वितरीत केला आहे.

Crop Damage
Crop Damage : पावसामुळे ज्वारी, बाजरी, गहू, भाजीपाल्याचे नुकसान

विभागवार निधी वाटप -

मार्च महिन्यात चार ते आठ मार्च आणि १६ ते १९ मार्च या कालावधित राज्याच्या विविध भागात अवकाळी पाऊस पडला होता. यामुळे फळबागांसग रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.

सर्व विभागीय आयुक्तांकडून शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देण्यासाठी निधी मागणीचे प्रस्ताव मागवण्यात आले होते. त्यानुसार राज्य सरकारकडून मदत निधी वितरीत करण्यात आला आहे.

Crop Damage
Hailstorm Crop Damage : गारपीट, पावसामुळे ७२ तासांत ५० हजार हेक्टरवरील पिके नष्ट
  • अमरावती विभाग - २४ कोटी ५७ लाख ९५ हजार रुपये

  • नाशिक विभाग - ६३ कोटी ९ लाख ७७ हजार रुपये

  • पुणे विभाग - ५ कोटी ३७ लाख ७० हजार रुपये

  • छ. संभाजीनगर विभाग - ८४ कोटी ७५ लाख १९ हजार रुपये

  • एकूण - १७७ कोटी ८० लाख ६१ हजार रुपये

दरम्यान, राज्य सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी, यासाठी राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधीपक्षांनी सरकारला धारेवर धरत मदत देण्याची मागणी केली होते. शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी, यासाठी विरोधकांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलनेही केली होती.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com