
Dam Water Stock पुणे : गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून उन्हाचा पारा (Heat) वाढल्याने धरणातील पाणीपातळी (Dam Water Level) घटू लागली आहे. यामुळे पाणीसाठा (Water Stock) वेगाने कमी होण्यास सुरुवात झाली आहे.
चालू फुब्रुवारी महिन्यात २० दिवसांत तब्बल २१ टीएमसी पाण्याचा वापर झाला आहे. यामुळे पुणे जिल्ह्यातील २६ धरणांत १३५.२७ टीएमसी एवढा पाणीसाठा शिल्लक आहे. येत्या तीन ते चार महिने उपलब्ध होण्यासाठी पाण्याचे योग्य ते नियोजन जलसंपदा विभागाला जूनपर्यंत करावे लागणार आहे.
जिल्ह्यात उजनीसह लहान-मोठी एकूण २५ धरणे आहेत. या धरणांतील चल (उपयुक्त) पाणीसाठ्याची क्षमता २१६.८४ टीएमसी एवढी आहे. या पाण्याचा वापर शेतीसाठी, तसेच पुणे आणि पिंपरी- चिंचवड येथील नागरिकांना होतो.
जानेवारीपर्यंत पाण्याची फारशी मागणी नसल्याने तीन ते साडेतीन महिन्यांत जवळपास ६०.५८ टीएमसी पाण्याचा वापर झाला होता. मात्र फेब्रुवारी महिन्यापासून अति उष्णतेमुळे धरणातील पाण्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली.
त्यामुळे धरणातील पाण्याची पाणीपातळी झपाट्याने कमी होत आहे. सध्या जिल्ह्यातील धरणांत मोठ्या प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध आहे. यंदा जूनमध्ये वेळेवर पाऊस न झाल्यास या धरणांतील
पाणीसाठा आणखी कमी होण्याची शक्यता आहे. मात्र पिण्याच्या पाण्याला प्राधान्य दिले जात असल्याने बरेचसे पाणी शिल्लक ठेवावे लागणार आहे. आतापर्यंत सुमारे ८१.५७ टीएमसी पाणीसाठ्याचा वापर झाला आहे.
सध्या उन्हाचा पारा वाढत असला, तरी धरणांतील मुबलक असलेली पाण्याची स्थिती पाहता येत्या काळात पाणीटंचाई कमी भासण्याची शक्यता आहे.
फेब्रुवारीच्या अखेरीसपासून उन्हाचा पारा हळूहळू वाढू लागल्याने पाण्याची गरज अधिक प्रमाणात गरज भासू लागली. उजनी धरण वगळता उर्वरित सर्वच धरणे पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागात आहे.
त्यातच पुणे व पिंपरी शहराची वाढती लोकसंख्या विचारात घेतली असता या दोन्ही शहरांना खडकवासला, चासकमान, पवना या धरणांतून पाण्याचा पुरवठा होतो. याशिवाय पूर्वेकडील पुरंदर, दौंड, बारामती, इंदापूर, खेड, शिरूर, जुन्नर आणि आंबेगाव या पूर्व भागातील तालुक्यांना पश्चिमेकडील धरणांतून शेतीसाठी पाण्याचा विसर्ग सोडला जातो.
सध्या खडकवासला, चासकमान, वीर, उजनी या धरणांतून पाण्याचा डाव्या, उजव्या कालव्याला पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. याचा वापर शेतीसाठी केला जात आहे. याशिवाय खडकवासला, पवना, गुंजवणी, भाटघर, निरा देवघर या धरणांतून बंद जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. त्यामुळे धरणातील पाणीपातळी वेगाने कमी होत आहे.
सोमवारी (ता.२०) धरणनिहाय उपलब्ध असलेला पाणीसाठा, टीएमसीमध्ये ः
टेमघर ०.४८, वरसगाव १०.३८, पानशेत ७.३६, खडकवासला १.१२, पवना ४.९४, कासारसाई ०.३७, कळमोडी १.४७, चासकमान ४.६०, भामा आसखडे ५.५९,
आंध्रा २.३०, वडीवळे ०.७१, शेटफळ ०.४८, नाझरे ०.४६, गुंजवणी २.९६, भाटघर १५.२९, निरा देवघर ८.९०, वीर ५.८३, पिंपळगाव जोगे २.४२, माणिकडोह ५.५६,
येडगाव १.२६, वडज ०.८१, चिल्हेवाडी ०.६३, घोड ३.२५, विसापूर ०.६०, उजनी ३९,०६, मुळशी १०.६१,
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.