
मुंबई : सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीने नुकसान (Heavy Rain Crop Damage) झालेल्या पिके आणि जमिनींच्या मदतीसाठी (Crop Damage Compensation) राज्य सरकारने २२२ कोटी ३२ लाख रुपयांची रक्कम विदर्भातील शेतकऱ्यांसाठी जमा केली आहे. नागपूर आणि अमरावती या दोन जिल्ह्यांतील शेतकरी या मदतीसाठी पात्र ठरले आहेत. सोलापूर आणि पुणे विभागांतील शेतकरीही काही प्रमाणात पात्र ठरेल आहेत.
राज्यात सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यांत मोठी अतिवृष्टी झाली होती. या पावसामुळे पिकांचे आणि शेतीचे मोठे नुकसान झाले होते. त्यांचे पंचनामेही करण्यात आले होते. मात्र मदत व पुनर्वसन विभागाकडे त्याचे प्रस्ताव पडून होते.
आतापर्यंत अतिवृष्टी आणि पुराच्या नुकसानीपोटी ५ हजार, ४३९ कोटी रुपये वितरित केले. मात्र नागपूर आणि अमरावती विभागाच्या आयुक्तांनी मदतीचे फेरप्रस्ताव पाठवले होते. ती मागणी प्रलंबित होती. त्यापोटी २२२ कोटी ३२ लाख रुपये रक्कम विभागीय आयुक्तांना वितरित करण्यात आले.
त्यामध्ये अमरावतीत विभागाला १७९ कोटी देण्यात आले. याचा लाभ १ लाख ४६ हजार शेतकऱ्यांना होणार आहे. नागपूर विभागासाठी ३१ कोटी, ४४ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. लाभ ३० हजार शेतकऱ्यांना होणार आहे. पुणे विभागातील सोलापूर जिल्ह्यासाठी ४ कोटी ६१ लाखांची भरपाई मंजूर करण्यात आली आहे. ३ हजार ५५८ शेतकऱ्यांना याचा लाभ होईल.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.