
अमरावती : जिल्ह्यात लम्पी स्कीन (Lumpy Skin) आजारामुळे जनावरांच्या दगावण्याचे प्रमाण सध्या अर्ध्यावर आले आहे. यापूर्वी दर दिवसाला ५० ते ६० जनावरांच्या दगावण्याचे प्रमाण होते, ते आता निम्म्यावर आल्याचा दावा पशुसंवर्धन विभागाकडून (Department of Animal Husbandry ) केला जात आहे. सद्यःस्थितीत सुमारे २५ ते ३० जनावरे मृत्युमुखी पडत असल्याची माहिती आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत २३०० जनावरांचा मृत्यू लम्पी स्कीन या चर्म आजारामुळे झाला आहे. पशुपालकांना पशुवर्धन विभागाकडून गायवर्गीय जनावरासाठी ३० हजार रुपये, बैलासाठी २५, तर लहान जनावर असल्यास १६ हजार रुपयांची मदत दिली जाते. यातील ८० टक्के निधीचे वाटप झाले असून २० टक्के मदतीचे वाटप निधीअभावी रखडले आहे. शासनाकडून निधी प्राप्त होताचा पशुपालकांना त्याचे वितरण केले जाणार आहे.
जिल्ह्यात सध्या बाधित जनावरांची संख्या १,५०० इतकी आहे. लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव झाल्यापासून आजवर ३,४००० जनावरांना त्याची लागण झाली होती. यातील ३०,००० पेक्षा अधिक जनावरे लसीकरण व पुरेशा उपचारांनी बरी झाली आहेत. जिल्ह्यात चार लाख २५ हजार जनावरांचे लसीकरण करण्यात आल्याची माहितीदेखील पशुसंवर्धन विभागाकडून देण्यात आली. लम्पी स्कीनचा म्युटंट बदलत असल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.