
Mumbai News : राज्यात मार्च महिन्यात अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) नुकसान (Crop Damage) झालेल्या नागपूर आणि कोकण विभागातील शेतकऱ्यांना २७ कोटी रुपयांची मदत वितरणास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. यामध्ये पालघर जिल्ह्यात सर्वाधिक ११ कोटी ५० लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे.
अवकाळी पावसाने विदर्भ आणि मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच नाशिक आणि अन्यत्र द्राक्षांच्या बागा, कांदा आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्यात येईल, असे सरकारने जाहीर केले होते. त्यानुसार अमरावती, नाशिक, पुणे आणि औरंगाबाद या विभागातील शेतकऱ्यांना या आधी मदत केली आहे.
अवकाळी पावसाने ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनाच जेवढ्या क्षेत्राचे नुकसान झाले आहे तेवढी मदत केली जाणार आहे. त्यानुसार कोकण आणि नागपूर या दोन विभागांसाठी २७ कोटी १८ लाख ५२ हजार रुपयांचा निधी जिल्हानिहाय वितरित करण्यात येईल. यामध्ये नागपूर विभागासाठी ११ कोटी ८७ लाख तर कोकण विभागासाठी १५ कोटी ३१ लाख ४९ हजार रुपये देण्यात येतील.
नागपूर विभागात सर्वाधिक नागपूर जिल्ह्यासाठी नऊ कोटी ७ लाख ४६ हजार तर कोकण विभागात पालघर जिल्ह्यासाठी ११ कोटी ५० लाख रुपये मदत करण्यात येईल. रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी कोकण विभागात एकही रुपयाची मदत करण्यात आलेली नाही.
नागपूर विभागाची जिल्हानिहाय मदत
नागपूर : ९ कोटी ७ लाख ४६ हजार
भंडारा : २१ लाख ८१ हजार
गोंदिया : २५ लाख ४० हजार
चंद्रपूर : ५४ लाख ३१ हजार
गडचिरोली : १ कोटी ७८ लाख
कोकण विभागाची जिल्हानिहाय मदत
ठाणे : १ कोटी १५ लाख ६० हजार
पालघर : ११ कोटी ५० लाख ८० हजार
रायगड : २ कोटी ६१ हजार ३७ हजार
रत्नागिरी : ०
सिंधुदुर्ग : ३ लाख ७२ हजार
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.