
Kolhapur News : झुलपेवाडी (ता. आजरा) येथील चिकोत्रा प्रकल्पावरील वीजनिर्मिती प्रकल्पात सात वर्षांत पहिल्यांदा टार्गेट पूर्ण झाले. प्रथमच ४१ लाख युनिट वीज निर्मितीचा टप्पा गाठला. पावसाच्या जादा प्रमाणासह अन्य कारणांमुळे जनित्रातून जास्त पाणी गेल्याने यंदा वीज निर्मिती जादा झाली आहे.
चिकोत्रा खोऱ्यातील कोरडवाहू शेती आणि सुमारे ३२ गावांतील पिण्याच्या पाण्याची सोय करणारा चिकोत्रा प्रकल्प येथील नागरिकांचा जिव्हाळ्याचा आहे. या प्रकल्पाशिवाय दुसरा पाण्याचा स्त्रोतच नसल्याने मॉन्सून सुरू झाल्यापासून ते मे महिन्यातील शेवटच्या आवर्तनापर्यंत पाणी साठा किती, याची विचारणा होत असते.
अनेकदा पाण्याची आवर्तने, उपसाबंदी यातून संवेदनशील प्रश्नही तयार झाले. वाढत्या उन्हाच्या तडाख्यामुळे या प्रकल्पात आता पिण्यासाठी पाणी राखीव ठेवले आहे. मॉन्सूनपूर्व आता शेतीला पाणी मिळणार नाही.
प्रत्येक आवर्तनावेळी प्रकल्पातून सोडल्या जाणाऱ्या पाण्यातून वीज निर्मिती केली जाते. १५ मार्च २०१७ पासून हा वीजनिर्मिती प्रकल्प सुरू झाला आहे. दरवर्षी ४१ लाख २८ हजार युनिट वीज निर्मितीचे उद्दिष्ट आहे, मात्र ते यावर्षी प्रथमच पूर्ण झाले आहे.
वीजनिर्मिती(युनिटमध्ये)
२०१६-१७ (१८ हजार ४६८)
२०१७-१८ (१२ लाख ९२ हजार ६००)
२०१८-१९ (२३ लाख ७३ हजार)
२०१९-२० (४० लाख ३० हजार)
२०२०-२१ (३२ लाख ७६ हजार ६६०)
२०२१-२२ (३३ लाख ५८ हजार ३७०)
२०२२-२३ (४१ लाख ३२ हजार ३५५)
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.