Crop Damage Compensation : नुकसान भरपाईसाठी ५२ महसूल मंडळ पात्र

निधी पात्र विमाधारक शेतकऱ्यांना विमा संरक्षण कालावधी पूर्ण होवून २१ दिवसांनंतर मिळू शकणार आहे. अर्थात, केळीचा विमा संरक्षण कालावधी ३० जुलैपर्यंत आहे. यानुसार ऑगस्टअखेरीस हा परतावा निधी शेतकऱ्यांना मिळेल, अशी अपेक्षा आहे.
Crop Damage
Crop DamageAgrowon

जळगाव ः पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा (Fruit Crop Insurance) योजनेतून (२०२२-२३) जिल्ह्यातील एकूण ५२ महसूल मंडळातील केळी (Banana Crop Insurance) पीकविमाधारकांना थंडीमुळे (Cold Weather) (कमी तापमान) झालेल्या केळीच्या नुकसान भरपाई (Banana Crop Damage Compensation) परतावे मिळणार असल्याची माहिती मिळाली आहे.

संबंधित महसूल मंडळांत किमान तापमान जानेवारीच्या सुरुवातीला ८ अंश सेल्सिअस व त्यापेक्षा कमी राहिल्याने केळीला फटका बसला. यात ज्यांनी पीकविमा योजनेतून २०२२- २३ या वर्षात केळी पिकासाठी विमा संरक्षण घेतले होते.

त्या केळी उत्पादकांना थंडीच्या नुकसानीसंबंधी परतावे मिळतील. त्यात प्रतिहेक्टरी २६,५०० रुपये एवढा परतावा निधी मिळणार आहे.

हा निधी पात्र विमाधारक शेतकऱ्यांना विमा संरक्षण कालावधी पूर्ण होवून २१ दिवसांनंतर मिळू शकणार आहे. अर्थात, केळीचा विमा संरक्षण कालावधी ३० जुलैपर्यंत आहे. यानुसार ऑगस्टअखेरीस हा परतावा निधी शेतकऱ्यांना मिळेल, अशी अपेक्षा आहे.

...असे आहेत निकष

फळ पीकविमा योजनेत जळगाव जिल्ह्यातील सुमारे ५२ हजारांवर शेतकरी सहभागी झाले आहेत. केळीच्या कमी व अधिक तापमानासह गारपीट, वेगाचा वारा (वादळ) यात नुकसान झाल्यास या योजनेतून विमाधारक पात्र नुकसानग्रस्त केळी उत्पादकांना परतावे मिळतात.

Crop Damage
Self Help Group : महिला बचत गटाची मॉलमध्ये दमदार एन्ट्री

यात १ नोव्हेंबर ते २८ फेब्रुवारी या दरम्यान सलग तीन दिवस ८ अंश ते ८ अंश सेल्सिअसखाली किमान तापमान राहिल्यास विमाधारकांना निर्देशानुसार परतावा मिळतो. तसेच उन्हाळ्यात १ ते ३० एप्रिलदरम्यान कमाल तापमान सलग पाच दिवस ४२ अंश किंवा ४२ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक राहिल्यास हेक्टरी ३५ हजार रुपये नुकसान भरपाई परतावा मिळतो.

तसेच १ ते ३१ मे या दरम्यान कमाल तापमान सलग पाच दिवस ४५ अंश सेल्सिअस किंवा यापेक्षा अधिक राहिल्यास नुकसान भरपाई परतावा ४३ हजार ५०० रुपये देय आहे.

यात एप्रिल व मे या दोन्ही महिन्यांत निश्‍चित केलेल्या कमाल तापमानासंबंधीच्या नुकसान भरपाईच्या निकषानुसार विमाधारक शेतकरी परताव्यासाठी पात्र ठरल्यास यातील एकच किंवा सर्वोच्च म्हणजेच मेमध्ये कमाल तापमानासंबंधी निश्‍चित केलेला प्रतिहेक्टरी ४३ हजार ५०० रुपये एवढा नुकसान भरपाई परतावा मिळू शकणार आहे.

कमी तापनातील नुकसान भरपाईसाठी पात्र महसूल मंडळे

भुसावळ : पिंपळगाव

बोदवड : बोदवड, करंजी, नाडगाव

चोपडा : अडावद, चोपडा, धानोरा, गोरगावले, हातेड

कमी तापनातील नुकसान भरपाईसाठी पात्र महसूल मंडळे

भुसावळ : पिंपळगाव

बोदवड : बोदवड, करंजी, नाडगाव

चोपडा : अडावद, चोपडा, धानोरा, गोरगावले, हातेड

जामनेर : जामनेर, मालदाभाडी, नेरी

Crop Damage
Flood Drought loss: पूर आणि दुष्काळामुळे ७० दशलक्ष सुपीक जमीन गमावली

मुक्ताईनगर : अंतुर्ली, घोडसगाव, कुऱ्हा

रावेर : खानापूर, खिर्डी, खिरोदा, निंभोरा, रावेर, सावदा

यावल : बामणोद, भालोद, फैजपूर, किनगाव, साखळी, यावल

अमळनेर : अमळगाव, अमळनेर, भरवस, मारवड, नगाव, पातोंडा, शिरुड

भडगाव : आमडदे, भडगाव, कजगाव, कोळगाव

चाळीसगाव : बहाळ

धरणगाव : चांदसर, पाळधी, पिंप्री, साळवा, सोनवद

एरंडोल : उत्राण

जळगाव : भोकर, म्हसावद, नशिराबाद, पिंप्राळा

पारोळा -बहादरपूर

डिसेंबरमध्ये धरणगाव व चोपडा तालुक्यांतील लासूर हे मंडळ कमी तापमानाच्या नुकसाना भरपाईच्या परताव्यांसाठी पात्र ठरले होते. थंडीमुळे जिल्ह्यात केळी उत्पादकांचे मोठे नुकसान झाले असून, उत्पादन खर्च वाढला आहे. यातील पीकविमाधारक केळी उत्पादकांना पीकविमा योजनेतून परतावे मिळणार असल्याने काहीसा दिलासा मिळणार आहे.
रक्षा खडसे, खासदार, रावेर लोकसभा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com