
सासवड : पुरंदर तालुक्यात गतवर्षी डिसेंबर २०२१ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे (Heavy Rain) शेतकऱ्यांच्या पिकांचे (Crop Damage) आणि पशुधनाचे (Livestock) मोठे नुकसान झाले होते. त्याबाबत शासनाकडून ६ कोटी ७२ लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे,
अशी माहिती आमदार संजय जगताप यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली. तर यंदाच्या अतिवृष्टीमुळे नुकसानीचे पंचनामे झाले आहेत. याचीही आर्थिक मदत लवकर मिळणार आहे, असे त्यांनी सांगितले.
गतवर्षी पुरंदर तालुक्यातील बहुतांश भागात अतिवृष्टीमुळे शेतातील उभ्या पिकांचे आणि फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. साधारणतः ५ हजार हेक्टरवरील पिके आणि १५० हेक्टरवरील फळबागा नुकसानग्रस्त झाल्या होत्या.
तर ३२ शेतकऱ्यांची जनावरे दगावली. १३ हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्यांचे नुकसान झाले. या बाबत पंचनामे करून शासनाकडून पिके आणि फळबागांसाठी ६ कोटी ६४ लाख ६८ हजार रुपयांची मदत दिली आहे.
तर अतिवृष्टी आणि कडाक्याच्या थंडीमुळे २०० पेक्षा अधिक मेंढ्या आणि इतर पशुधन दगावलेल्या ३२ शेतकऱ्यांना ७ लाख ४१ हजार रुपयांची मदत देण्यात येईल, असे जगताप यांनी नमूद केले आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.