Crop Damage Compensation : नुकसानीच्या मदतीसाठी हवेत ८७७ कोटी रुपये

जिल्ह्यात यंदा खरिपात सातत्याने पाऊस, अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे. जून-जुलैमध्ये अल्प नुकसान झाले. मात्र सप्टेंबर आणि आक्टोबर या दोन महिन्यात शेतीपिकांची पावसाने अक्षरशः माती झाली.
Crop Damage Compensation
Crop Damage Compensation Agrowon

नगर ः सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात सातत्याने झालेल्या पाऊस, अतिवृष्टीने (Heavy Rain) झालेल्या नुकसानीचे पंचनामे (Crop Damage Survey) अखेर पूर्ण झाले आहेत. प्रशासनाने दिलेल्या अहवालानुसार एकट्या जिल्ह्यात यंदा खरिपात ४ लाख ४१ हजार ११९ हेक्टरचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान (Crop Damage) झाले आहे. २१०० गावांतील सात लाख ४४ हजार ९३८ शेतकऱ्यांना हा फटका बसला आहे. नुकसानीची मदत देण्यासाठी सुमारे ८७७ कोटी २० लाखाची गरज आहे. सर्वाधिक फटका सप्टेंबर व आक्टोबर महिन्यात बसला आहे.

Crop Damage Compensation
Crop Damage Survey : ‘पंचनामे राहिलेल्या शेतकऱ्यांनो संपर्क साधा’

जिल्ह्यात यंदा खरिपात सातत्याने पाऊस, अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे. जून-जुलैमध्ये अल्प नुकसान झाले. मात्र सप्टेंबर आणि आक्टोबर या दोन महिन्यात शेतीपिकांची पावसाने अक्षरशः माती झाली. सोयाबीन, कापूस, बाजरी, मका, कांदा, फळपिकांना जास्त फटका बसला. ऑक्टोबरमध्ये सलग १५ दिवस पाऊस सुरुच राहिला. त्यामुळे अधिक फटका बसला. पाऊस थांबून २० दिवस झाले तरी अजूनही पंचनामे सुरु होते. दोन दिवसांपूर्वी पंचनामे संपले आहेत. जिल्हा प्रशासनाने वरिष्ठांकडे अहवाल पाठवला आहे.

Crop Damage Compensation
Crop Damage Survey : मंगळवेढ्यात पीक नुकसानीच्या पंचनाम्याबाबत नव्याने आदेश

नगर जिल्ह्यात तब्बल खरिपात ४ लाख ४१ हजार ११९ हेक्टरचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले. २१०० गावांतील सात लाख ४४ हजार ९३८ शेतकऱ्यांना हा फटका बसला. नवीन निकषानुसार जिराईत क्षेत्रासाठी १३ हजार रुपये, बागायत क्षेत्रासाठी २७ हजार व फळबागांसाठी ३६ हजार रुपये प्रतिहेक्टरी नुकसान मदत देण्यासाठी सुमारे ८७७ कोटी २० लाखांची गरज आहे.

एका ऑक्टोबर महिन्यात सुमारे १३८८ गावांत पाच लाख शेतकऱ्यांच्या शेतात ३ लाख पाच हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. या महिन्यातील नुकसानीपोटी ५९० कोटी २१ लाख रुपयांची मागणी केली आहे. सप्टेंबरमध्ये ७१७ गावांत २ लाख २२ हजार शेतकऱ्यांच्या शेतात १ लाख ३५ हजार हेक्टरचे नुकसान झाले. या शेतकऱ्यांना मदतीसाठी २८७ कोटींची गरज आहे, असे अहवालात नमूद आहे.

शेतजमिनीचेही नुकसान

जोरदार पूर, पाण्याच्या प्रवाहामुळे जमीन खरडून जाणे, मातीचा थर साचून नुकसान होणे असाही फटका बसला आहे. पारनेर तालुक्यातील वडझिरे, निघोज, अकोल्यातील समशेरपूर, शेंडीत शेती नुकसानीचा पावणे तीनशे शेतकऱ्यांना फटका बसला. सुमारे ५६ हेक्टर शेतीचे असे नुकसान झाले आहे. त्यासाठी २० लाखांची नुकसान भरपाई दिली जाईल. जमीन खरडून, वाहून गेल्यास हेक्टरी ३७ हजार ५००, तर इतर ठिकाणची माती वाहून येऊन नुकसान झाले तर १२२०० रुपये प्रतिहेक्टरी नुकसान भरपाई दिली जाईल.

...असे आहे नुकसान

एकूण अतिवृष्टी

गावे ५७९

शेतकरी २,७५,०६८

क्षेत्र १,५५,३५४

मदतीची निधी २९० कोटी ९१ लाख

एकूण सतत पाऊस

गावे १५२६

शेतकरी ४,६८,८६२

क्षेत्र २,८५,७६५

मदतीसाठी निधी ५८६ कोटी ३० लाख पाऊस, अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. त्याबाबत अहवाल शासनाला पाठविला आहे. अजून कोठे पंचनामे राहिले असले, तर त्याबाबत माहिती देण्याचे आवाहन केले आहे.
डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हाधिकारी, नगर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com