Sugar Export : साखर निर्यातीमुळे कारखान्यांच्या ताळेबंदात सुधारणा

सातत्यपूर्ण साखर निर्यातीमुळे गेल्या दोन-तीन वर्षांमध्ये साखर कारखानदारीला चांगले दिवस आले आहेत.
Cooperative Conference
Cooperative Conference Agrowon

Sakal Cooperation Conclave पुणे : सातत्यपूर्ण साखर निर्यातीमुळे (Sugar Export) गेल्या दोन-तीन वर्षांमध्ये साखर कारखानदारीला (Sugar Industry) चांगले दिवस आले आहेत. जागतिक बाजारात भारताचे वर्चस्व तयार झाले आहे. हा दबदबा कायम ठेवण्यासाठी साखर कारखानदारांनी विविध पातळ्यांवर एकत्रित प्रयत्न करावेत, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला.

सहकार महापरिषदेमध्ये ‘साखर व्यापार व निर्यात’ या विषयावर परिसंवाद झाला. यामध्ये विविध तज्ज्ञांनी मते मांडली. यामध्ये ‘ईडीएफ मन’चे कार्यकारी संचालक संदीप कदम, जवाहर सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक मनोहर जोशी, शाहू सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण आदींनी सहभाग घेतला.

Cooperative Conference
Cooperative Conference : आगामी दशक सहकाराचेच

श्री. कदम म्हणाले, की पहिल्यांदा नियमित साखर निर्यात होत नसल्याने जागतिक बाजारात भारताची प्रमुख निर्यात दारामध्ये गणना होत नव्हती. गेल्या दोन-तीन वर्षांपासून हे चित्र बदलले.

भारतात जादा साखर उत्पादन होत असल्याने सुरुवातीला अनुदान देऊन निर्यात करण्यात आली. गेल्या दोन वर्षांत मात्र कारखाने स्वयंस्फूर्तीने निर्यातीसाठी पुढे आले. गेल्या वर्षात विक्रमी निर्यात होऊन भारत सर्वाधिक साखर निर्यात करणारा देश बनला.

स्थानिक दरापेक्षा गेल्या वर्षीपासून आंतरराष्ट्रीय बाजारात जादा दर मिळत आहेत. त्यामुळे निर्यातीसाठी चांगली संधी आहे.

Cooperative Conference
Cooperative Conference : उच्च उत्पादन क्षमतेकडे उसाची वाटचाल

श्री. चव्हाण म्हणाले, की निर्यातीला चांगले वातावरण असल्याने भारतीय कारखानदारांनी योग्य व्यवहार करून अपेक्षित नफा मिळवावा. आम्ही योग्य व्यवहार ठेवल्याने निर्यातीला पसंती आहे.

श्री. जोशी म्हणाले, की साखर निर्यातीमुळे कारखान्याची बॅलन्स शीट सुधारण्यासाठी वाव मिळाला. जागतिक बाजारात सातत्याने साखरेचे दर वाढत चांगले दिवस येतील. निर्यात करारात पारदर्शकपणा ठेवून भारतीय साखरेचे महत्त्व वाढवण्याची जबाबदारी साखर उद्योगावर आहे.

या वेळी स्थानिक उत्पादन, स्थानिक खप व बाहेरील देशातून येणारी मागणी याबाबत तज्ञांनी आपली मते व्यक्त केली. जादा नफ्यासाठी काही कारखानदारांनी झालेले करार मोडल्याने साखर बाजारात नकारात्मक संदेश गेला. यामुळे अनेक घटकांचे नुकसान झाले. याचा फटका चांगल्या साखर कारखान्यांना नवे करार करताना बसला. हे टाळण्यासाठी कारखान्यांनी सर्व बाजूंनी विचार करूनच करार करावेत, अशी अपेक्षा या वेळी व्यक्त करण्यात आली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com