Barsu Refinery : रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थनार्थ राजापुरात मोर्चा

तालुक्यातील बारसू येथील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाच्या उभारणीच्या समर्थनार्थ काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या प्रकल्प समर्थकांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले.
Barsu Refinery
Barsu RefineryAgrowon

Barsu Refinery Project तालुक्यातील बारसू येथील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाच्या (Refinery Project) उभारणीच्या समर्थनार्थ काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या प्रकल्प समर्थकांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले.

‘कोकणच्या विकासासाठी आणि आमच्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी बारसू येथील ग्रीन रिफायनरी झालीच पाहिजे,’’ अशी आग्रही मागणी करण्यात आली.

या वेळी ‘आता एकच हट्ट... रिफायनरी घट्ट’ अशा जोरदार घोषणा देत देण्यात आल्या. जवाहर चौकातून मोर्चाने राजापूर तहसीलदार कार्यालयात जाऊन रिफायनरी प्रकल्प उभारणीच्या मागणीचे निवेदन प्रकल्प समर्थकांनी तहसीलदारांना दिले.

Barsu Refinery
Barsu Refinery Latest News: उध्दव ठाकरेंच्या बारसू येथील सभेसाठी नकारघंटा ; मात्र, रिफायनरी विरोधकांना भेटता येणार

तालुक्यातील बारसू परिसरातील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थनार्थ भाजपचे प्रदेश सचिव व माजी खासदार नीलेश राणे, आमदार नीतेश राणे, भाजप प्रदेश उपाध्यक्ष अतुल कालसेकर, प्रदेश सरचिटणीस आणि माजी आमदार प्रमोद जठार, भाजपचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष राजन तेली, शिवसेना जिल्हा प्रमुख राहुल पंडित, भाजपचे रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र नागरेकर, तालुका अध्यक्ष अभिजित गुरव, शिवसेना तालुका प्रमुख अशफाक हाजू, रिफायनरी समर्थन समितीचे नेते हनिफ मुसा काझी, राजापूर तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष संदीप मालपेकर, माजी नगरसेवक सौरभ खडपे, भाजपच्या महिला नेत्या उल्का विश्वासराव यांच्या नेतृत्वाखाली आज प्रकल्प समर्थक, ग्रामस्थ यांनी शहरामध्ये मोर्चा काढला.

यामध्ये मोठ्या संख्येने समर्थक ग्रामस्थ, विविध समर्थक संघटना सहभागी झाल्या होत्या. या वेळी तालुक्याच्या भवितव्यासाठी रिफायनरी प्रकल्प झालाच पाहिजे अशी आग्रही यांनी मागणी केली.

Barsu Refinery
Uddhav Thackeray Barsu : उद्धव ठाकरे बारसूमध्ये, दौऱ्यापूर्वीच तापले वातावरण

‘‘प्रकल्प विरोधकांशी संवाद साधण्याच्या नावाखाली हेलिकॉप्टरमधून कोकणात पर्यटनासाठी आलेले उद्धव ठाकरे हेच महाराष्ट्रातील सर्वांत मोठे दलाल आहेत. त्यांना मन की नाही तर धन की बात कळते,’’ अशा शब्दांमध्ये जोरदार टीका आमदार नीतेश राणे यांनी केला आहे.

‘‘रिफायनरी प्रकल्प बारसूत करा, असे पत्र देण्यासाठी शंभर कोटींची दलाली घेणारे उद्धव ठाकरे आता प्रकल्प विरोधासाठी सेटिंग करून विरोध करत आहेत,’’ असा आरोपही त्यांनी या वेळी केला.

रिफायनरी प्रकल्पामुळे होणारा विकास आणि येणाऱ्या आर्थिक समृद्धीतून कोकण विकासात्मकदृष्ट्या पुढे जाणार आहे. त्यामुळे विकासासह रोजगार निर्मितीसाठी समस्त कोकणवासीयांना हा प्रकल्प हवा असल्याचेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.

तर भाजपचे प्रदेश सचिव माजी खासदार नीलेश राणे म्हणाले, ‘‘कायमच कोकणात पर्यटनासाठी येणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी कोकणला आणि कोकणी जनतेला वाऱ्यावर सोडलेले आहे.

मुख्यमंत्री असताना रिफायनरी प्रकल्पासाठी बारसूची जागा योग्य असल्याचे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना द्यायचे आणि आता मुख्यमंत्रिपद गेल्यावर या प्रकल्पाच्या विरोधात भूमिका घ्यायची असे दुटप्पी राजकारण ते करत आहेत.

महाराष्ट्राला आणि कोकणला विकासापासून वंचित ठेवून महाराष्ट्राचा आणि कोकणचा गळा घोटण्याचे काम उद्धव ठाकरे करत आहेत.’’ अवघ्या ४८ तासांत समर्थकांची शक्ती काय आहे हे आम्ही दाखवून दिले आहे. ही फक्त झलक आहे. पुढच्या काही दिवसांत भव्य अशा समर्थकांच्या समर्थन सभेने या प्रकल्पाला असलेले समर्थन दिसून येईल, असेही नीलेश राणे म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com