Kisan Long March : शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यासोबत होणार बैठक

आजच्या बैठकीतून तरी शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होणार का याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
Kisan Long March
Kisan Long MarchAgrowon

Kisan Long March आपल्या विविध मागण्यांसाठी नाशिक ते मुंबई असा शेतकऱ्यांचा लाँग मार्च निघाला आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात (Farmers Demand) चर्चा करण्यासाठी मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) आणि सहकारमंत्री अतुल सावे (Atul Save) यांची बुधवारी (ता. १५) रात्री उशिरा आंदोलकांशी चर्चा झाली मात्र, या चर्चेतून कोणताही तोडगा निघाला नाही.

या पार्श्वभूमीवर गुरूवारी (ता. १६) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आंदोलक शेतकऱ्यांची बैठक पार पडणार आहे.

शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळासोबत मंत्रालयात दुपारी तीन वाजता ही बैठक पार पडणार आहे. आजच्या बैठकीतून तरी शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होणार का याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

या संदर्भात दादा भुसे म्हणाले की, शेतकऱ्यांच्या चौदा मागण्यांपैकी प्रत्येकी मुद्यावर आम्ही कमी अधिक प्रमाणाक चर्चा केली. एकूण मागण्यांपैकी पन्नास टक्के मागण्यांबाबत सरकार सकारात्मक आहे. सर्वच मागण्या होतील असे नाही.

काही कायदेशीर बाबींमुळे काही मागण्यांसाठी वेळ लागू शकतो. त्यामुळे प्रत्येक मुद्यानुसार चर्चा केली जाईल, असे भुसे यांनी सांगितले.

Kisan Long March
kisan Long March : आंदोलक शेतकऱ्यांशी चर्चा करून सरकारने प्रश्न सोडवावा: अजित पवार

दरम्यान, मोर्च्यात सहभागी झालेल्या अनेक शेतकऱ्यांना आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे सरकारने त्यांच्याकडे लक्ष द्यावे, असे मोर्च्याचे नेतृत्त्व करणाऱ्या जे. पी. गावित यांनी म्हटले आहे.

दरम्यान, सरकारसोबतच्या बैठकीसंदर्भात बोलताना गावित म्हणाले की, काल सरकारच्या मंत्र्यांसोबत चर्चा झाली. उद्या तीन वाजता विधानभवनाच्या समिती कक्षामध्ये या. तिथे आपण चर्चा करू. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होतील, अशा अपेक्षेनेच आम्ही चर्चेला येण्याचे आश्वासन दिले आहे.

Kisan Long March
Kisan Long March : दादा भुसे आणि अतुल सावे यांची किसान सभेच्या नेत्यांशी रात्री उशिरा चर्चा

दरम्यान, विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांचा लाँग मार्च विधानभवनावर धडक देणार आहे. किसान सभेच्या नेतृत्वात निघालेल्या मोर्च्यात हजारोंच्या संख्यने शेतकरी सहभागी झाले आहेत.

या संदर्भात मंगळवारी (ता. १४) आयोजित केलेली बैठक अचानक रद्द केल्याने मोर्चेकऱ्यांनी संताप व्यक्त केला होता.

तसेच आता चर्चेसाठी आमच्याकडे, या असा निरोप सरकारला दिला होता. त्यानंतर सरकारमधील भुसे आणि सावे या दोन मंत्र्यांनी बुधवारी रात्री उशिरा आंदेलकांशी चर्चा केली. पंरतु या चर्चेतून शेतकऱ्यांचे समाधान न झाल्याने कोणताही तोडगा निघालेला नाही.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com