
शेलुबाजार, जि. वाशीम ः या परिसरात रब्बीत हरभऱ्याची (Rabi Chana) मोठ्या प्रमाणात लागवड (Chana Cultivation) झाली असून, या पिकात सध्या शेतकरी कोळपणीचे काम जोमाने करताना दिसत आहेत. बैलजोडीच्या साह्याने शेताशेतांमध्ये कोळपणी होताना दिसून येते.
शेतीत यंत्रांचा वापर वाढला तरी काही कामांसाठी बैलजोडीच फायदेशीर ठरते, असा शेतकऱ्यांचा अनुभव आहे. हरभरा पिकात सध्या कोळपणीसाठी त्यामुळेच बैलजोडीचा वापर केला जात आहे. कोळपणीमुळे पिकाची आंतरमशागत होऊन तण नियंत्रणासाठीही फायदा होतो. त्यामुळे सध्या या भागात बैलजोडीची मागणी वाढलेली आहे. आजच्या युगात शेतीतील बहुतांश कामे यंत्राने होत आहेत.
शिवाय बैलांचे प्रमाणही कमी झाले आहे. तरीही काही शेतकऱ्यांनी शेतीसाठी बैलजोड्या जोपासल्या असून शेतीच्या कामांसाठी सध्या त्यांचा वापर केल्या जात आहे. या भागात हरभऱ्याची लागवड होऊन आता अनेक ठिकाणी महिना ते दीड महिन्याचा कालावधी झाला आहे. कुठे पहिली तर कुठे दुसरी कोळपणी शेतकरी करीत आहेत. एकदा पिकाची वाढ झाल्यानंतर मग कोळपणी करणे शक्य होत नाही.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.