
नाशिक : कामगार विभागांमार्फत (Department of Labor) राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या अंमलबजावणीकरिता कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व विभागांनी उत्पन्नाचे स्रोत वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्नपूर्वक नियोजन करावे. तसेच कामगारांना किमान वेतन न देणाऱ्या ठेकेदारांवर कडक करावाई करण्यात यावी, असे निर्देश कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी दिले आहेत.
शासकीय विश्रामगृह येथे गुरुवारी (ता. १) झालेल्या कामगार विभागाच्या विभागीय आढावा बैठकीत डॉ. खाडे बोलत होते. या वेळी कामगार विभागाच्या प्रधान सचिव डॉ. विनिता सिंगल, कामगार आयुक्त सुरेश जाधव, औद्यगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाचे संचालक मुकेश पाटील, आरोग्य सुरक्षा व आरोग्य संचालनालयाच्या सहसंचालक अंजली आढे, उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाचे उपसचिव दीपक पोकळे, दा. सो. खताळ, कामगार कल्याण आयुक्त र. ग. इळवे, माथाडी सह. आयुक्त विलास बुवा, कामगार उपआयुक्त विकास माळी यांच्यासह विभागातील जिल्ह्यांचे विभागप्रमुख उपस्थित होते.
डॉ. खाडे म्हणाले, की कामगार विभागाने पोलीस यंत्रणा व स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने टाकलेल्या धाडीत जी बालके आढळतील त्यांना बाल कल्याण समितीकडे हस्तांतरीत करावे. कामगार विभाग, जिल्हा परिषद, महापालिका व पोलीस यंत्रणा यांची एकत्रितपणे बैठक घेण्यात यावी, बालकामगारविरोधी जनजागृतीवर भर द्यावा.
वेठबिगारीत आढळून आलेल्या मुलांचे पुर्नवसन करताना त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांच्यासाठी असलेल्या इतर योजनांचादेखील लाभ देण्यात यावा. याबाबतचा अहवाल सादर करण्यात यावा. त्याचप्रमाणे किमान वेतनाबाबतच्या प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढण्यात यावीत, अशा सूचाना मंत्री डॉ. खाडे यांनी दिल्या.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.