
Alibaug News वाळू उत्खनन, उपसा पारदर्शक व्हावी, यासाठी जिल्हा प्रशासनाने लिलाव प्रक्रिया सुरू केली असली तरी त्याला प्रतिसाद मिळालेला नाही. बेकायदा वाळू (Illegal Sand Mining) उत्खनन मात्र सुरूच आहे.
या वाळूमाफियांवर जिल्हा खनिकर्म विभागाने दणका दिला आहे. वर्षभरात २७८ जणांविरोधात कारवाई करून १५ कोटी ३५ लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
अलिबाग तालुक्यासह रोहा, श्रीवर्धन, मुरूड, बोर्ली, रेवदंडा, आक्षी, धरमतर, भोनंग ताजपूर आदी परिसरात मोठ्या प्रमाणात वाळू उत्खनन होत आहे. वाळू उपशामुळे खाडी, नदीतील पाण्याचा प्रवाह बदलू लागला आहे.
खाडी, नदीकिनारी असलेल्या गावांना, वाड्यांना पुराचा धोका निर्माण झाला आहे. खाडी किनारी असलेल्या झाडांची धूप होऊ लागली आहे. रात्रीच्या वेळी छुप्या पद्धतीने जेसीबी अथवा, सक्शन पंपाद्वारे उत्खनन केले जात आहे. वाळूची चोरी होत असल्याने दरही वाढले आहेत.
१५ कोटींचा दंड वसूल
जिल्ह्यामध्ये वर्षभरात अवैध वाळू उपसा करणाऱ्यांसह वाहतूक करणाऱ्यांवर जिल्हा खनिकर्म विभागामार्फत कारवाई करण्यात आली आहे. १५ कोटी ३५ लाखांचा दंड वसूल करण्यात आल्याचे खनिकर्म विभागाकडून सांगण्यात आले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.