Urad Damage : उडीद नुकसानीबाबत कृषी विभाग उदासीन

जळगाव ः जिल्ह्यात उडीद पिकाला शेंगा न लागणे, दाणे बारीक असणे, अनावश्यक वाढ आदी कारणांमुळे सुमारे २० ते २५ टक्के पीक हातचे गेले आहे.
Urad
Urad Agrowon

जळगाव ः जिल्ह्यात उडीद पिकाला (Urad Crop Damage) शेंगा न लागणे, दाणे बारीक असणे, अनावश्यक वाढ आदी कारणांमुळे सुमारे २० ते २५ टक्के पीक (Crop Damage) हातचे गेले आहे. पिकावर शेतकऱ्यांनी मागील पंधरवड्यात रोटाव्हेटर फिरविला. परंतु या समस्येबाबत कृषी विभागाने (Agriculture Department) गांभीर्याने दखल घेतलेली नसल्याची माहिती आहे.

Urad
Urad Procurement : सरकार आयात उडीद खरेदी करणार

जिल्ह्यात तापी, गिरणा, अनेर नदीकाठी उडीद पीक असते. अनेक शेतकरी कांदेबाग केळी लागवडीपूर्वी बेवडसाठी उडीद पीक घेतात. यामुळे लागवड जिल्ह्यात बऱ्यापैकी असते. यंदा पिकाची उगवण व वेळेत पाऊस आल्याने वाढही चांगली झाली. परंतु त्याला शेंगा न लागणे, दाणे बारीक राहणे किंवा शेंगा अत्यल्प असणे अशी समस्या तयार झाली. सर्वच भागांत ही समस्या आहे. काही शेतकऱ्यांना पर्यायच नसल्याने त्यांनी पीक तसेच राहू दिले. तर काहींनी पिकावर रोटाव्हेटर फिरवून पुढे आगाप केळी, हरभरा, मका लागवडीचे नियोजन केले.

Urad
Urad Production : शेंगा न लागल्याने खानदेशात उडदाचे मोठे क्षेत्र रिकामे

उडीद पिकातील या समस्येबाबत कृषी विभागाने पंचनामे करून पुढील कार्यवाहीसंबंधी नकार दिला आहे. फक्त पाहणी, पर्यटन कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी केल्याचे समोर आले आहे. याबाबत भरपाई मिळेल, की नाही हा संभ्रम आहे. कारण शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पाहणी करताना या समस्येला बियाणे पुरवठादार दोषी आहेत, त्यांना बोलवा, असे सांगून हात झटकले आहेत. काही भागात कृषी सहायक, पर्यवेक्षक पोचलेच नाहीत. मुजोरीदेखील झाल्याची माहिती आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. बियाणे पुरवठा, उपलब्धता, त्याची गुणवत्ता, त्यामुळे होणारे नुकसान, चांगले परिणाम यासाठी कृषी विभागाची देखील जबाबदारी आहे. पण ही बाब न लक्षात घेता कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी याबाबत नामानिराळे होण्याचा प्रयत्न केला आहे.

लेखी तक्रार हवी, अशी भूमिका कृषी विभाग नेहमीप्रमाणे घेत आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. जिल्ह्यात सुमारे चार ते पाच हजार हेक्टरवरील उडीद पिकात शेंगा न लागण्याची समस्या आहे. संबंधित उडीत उत्पादकांचे नुकसान झाले आहे. अतिपावसाने इतर पिकेही हातची जातील, अशी स्थिती आहे. अशात वित्तीय संकट उभे राहत आहे. यामुळे शेतकऱ्यांना मदतीची अपेक्षा आहे.

उडीद पिकावर रोटाव्हेटर फिरवावा लागला. या बाबत शेतकऱ्यांनी ओरड केल्यानंतर कृषी विभागाचे कर्मचारी आले, पण त्यांनी पंचनामे, नुकसान भरपाईबाबत काहीएक भूमिका मांडली नाही. याला बियाणे पुरवठादार जबाबदार आहेत. त्यांना बोलवा व पुढील कार्यवाही करून घ्या, असे सांगून कृषी सहायक, पर्यवेक्षक निघून गेले.
एक शेतकरी, जळगाव

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com