
तुर्भे, जि. नवी मुंबई : वातावरणात सध्या गारठा (Cold Weather) पडला आहे. त्यात एमआयडीसीमधील रासायनिक कंपन्यांमधून मोठ्या प्रमाणावर हवेत प्रदूषित वायू (Air Pollution) सोडले जात आहेत.
त्यामुळे दाट धुक्याबरोबरच (Fogg) होणाऱ्या वायुप्रदूषणामुळे वाशी परिसरात अनेकांना श्वास घेण्यास अडचणी येत आहेत. विशेष म्हणजे याबाबत वारंवार तक्रारी करूनदेखील प्रदूषण नियंत्रण मंडळ दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.
आठवडाभरापासून नवी मुंबईत थंडी वाढली आहे. त्यामुळे हवेत गारवा असल्याने सकाळी दाट धुके पडत आहे. अशातच रात्रीच्या एमआयडीसीतील काही रासायनिक कंपन्यांमधून प्रदूषित वायू सोडण्याचे प्रमाण वाढले आहे.
त्यामुळे गेल्या आठवडाभरापासून वाशी विभागातील हवेची गुणवत्ता खालावली आहे. अशी हवा आरोग्यास अतिशय खराब असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. हीच परिस्थिती पावणे, कोपरी सेक्टर २६, तुर्भे विभागात आहे. रात्रीच्या वेळी प्रदूषित हवेमुळे श्वास घेण्यास अडचण येत आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.