Ajit Pawar : अवकाळी पावसाचे विधानसभेत पडसाद

राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे प्रशासन ठप्प आहे. बाजारभाव, अवकाळी पाऊस यामुळे दुहेरी संकटात असणारा शेतकरी नुकसानीचे पंचनामे होत नसल्याने तिहेरी संकटात सापडला आहे.
Ajit Pawar
Ajit PawarAgrowon

Maharashtra Budget Session 2023 मुंबई : राज्यात अवकाळी पावसासह (Unseasonal Rain) गारपीट (Hailstorm) होत आहे. पिकांसह, फळबागांचे मोठे नुकसान (Crop Damage) झाले असताना हवामान खात्याने राज्याला ‘येलो अलर्ट’ दिला आहे.

तरीही सरकार संवेदनशील नाही. कृषिमंत्री तारे तोडत आहेत, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी सरकारला सुनावले.

कामकाज सुरू झाल्यानंतर शुक्रवारी (ता. १७) कामकाजाचा मुद्दा उपस्थित करत राज्यातील सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर असंवेदनशील आहे, अजूनही अनेक ठिकाणी नुकसानीचे पंचनामे सुरू करण्यात आलेले नाहीत. राज्यातला शेतकरी हवालदिल झाला आहे.

राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे प्रशासन ठप्प आहे. बाजारभाव, अवकाळी पाऊस यामुळे दुहेरी संकटात असणारा शेतकरी नुकसानीचे पंचनामे होत नसल्याने तिहेरी संकटात सापडला आहे.

राज्याचे कृषिमंत्री शेतकऱ्यांच्या प्रश्‍नी काहीही विधाने करून ‘अकलेचे तारे’ तोडत असल्याचे सांगून कृषिमंत्र्यांचाही समाचार घेतला.

Ajit Pawar
Ajit Pawar : शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अजित पवारांचा आक्रमक पवित्रा

राज्यात दिनांक ५, ६ व ७ मार्च रोजी अवकाळी पाऊस होऊन सर्वच पिकांचे नुकसान झालेले आहे. राज्यातील सरकारी कर्मचारी बेमुदत संपावर गेलेले आहेत.

त्यामध्ये पंचनामे करणारे ग्रामसेवक, तलाठी व कृषी सहायक यांचाही समावेश आहे. त्यामुळे राज्यात नुकसानीचे पंचनामे अद्याप सुरू झालेले नाहीत.

जी आकडेवारी शासन सभागृहात सांगत आहे हे केवळ अंदाजे आणि कार्यालयात बसून दिलेली आकडेवारी आहे. शेतीमालाला भाव नसल्याने शेतकरी अगोदरच आर्थिक विवंचनेत असताना अवकाळी पावसामुळे अस्मानी संकट उभे राहिले आहे.

Ajit Pawar
Ajit Pawar News: दूध भेसळ करणाऱ्यांना फाशीच्या शिक्षेची तरतूद करावी- अजित पवार

‘कृषिमंत्री जखमेवर मीठ चोळत आहेत’

पवार यांनी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर कडाडून टीका केली. ते म्हणाले, की सत्तार यांनी ‘अवकाळीने शेतीचे फार नुकसान झालेले नाही’ अशी वक्तव्ये करून ‘अकलेचे तारे’ तोडून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करत आहेत, या बाबत अजित पवार यांनी तीव्र संताप व्यक्त केला.

दरम्यान, अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे तातडीने सुरू करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणीही अजित पवार यांनी केली.

पंचनामे करू

अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून, मदत दिली जाईल, असे आश्‍वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. सरकार शेतकऱ्यांच्या मागे उभे राहील. त्यांना कुठलाही त्रास होणार नाही, असेही ते म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com