
अमरावती : पावसावर अवलंबून असलेल्या कृषी (Agriculture) प्रणालीत विकास घडवून आणण्यासाठी विविध योजनांची सांगड घालून सर्व विभागांनी संघटित व सर्वकष प्रयत्न करावेत, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी दिले.
विभागीय आयुक्तालयात पश्चिम विदर्भात पावसावर अवलंबून असलेल्या शेती प्रणालीबाबत कार्यशाळा झाली. त्या वेळी ते बोलत होते. महाराष्ट्र आरआरए नेटवर्कचे राज्य समन्वयक सजल कुलकर्णी तसेच विभागातील पाचही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी आणि कृषी, मनरेगा, आदिवासी विकास विभाग, जलसंधारण, वने, पशुसंवर्धन आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होतेसोशिओ इकॉनॉमिक सर्वेक्षणानुसार ग्रामीण भागातील ३७.०५ टक्के कुटुंबे शेतीवर व ४४.३७ टक्के कुटुंबे शेतीविषयक मजुरीवर अवलंबून आहेत.
त्यातही दोन हेक्टरहून कमी जमीन असलेल्या कुटुंबांची संख्या मोठी आहे. त्यामुळे पावसाधारित शेती पद्धतीत सुधारणा अत्यावश्यक आहेत. त्यात बहुविध पीकपद्धती, शेतीमाल विपणन, पूरक व्यवसायाबरोबरच कृषी उत्पादकता वाढविणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने सर्व विभागांनी समन्वयपूर्वक प्रयत्न करण्याचे निर्देश डॉ. पांढरपट्टे यांनी दिले.
पश्चिम विदर्भातील शेतकरी अद्यापही पावसाधारित शेतीवर, वनाधारित उत्पादनांवर अवलंबून आहेत. त्यात विकास घडवून आणण्यासाठी महाराष्ट्र आरआरए नेटवर्क या संस्थेने प्रकल्प हाती घेतला आहे, अशी माहिती कुलकर्णी यांनी दिली.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.