
नांदेड : रब्बीच्या पेरण्या सुरू असताना अर्धापूर येथील वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सक्तीची वीजबिल वसुलीसाठी वीज खंडित केली होती. यामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर शुक्रवारी (ता.२) रुमणे मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला होता. याची दखल घेत अधिकाऱ्यांनी वीज पुरवठा सुरळीत केला. यामुळे मोर्चा दहा दिवसांसाठी स्थगित केला आहे.
अर्धापूर तालुक्यातील बहुतांश शेती ओलिताखाली असल्याने विजेची मागणी बारमाही राहते. सध्या रब्बीच्या पेरण्यासुरू झाल्या असून नेमकी हीच संधी साधून शेतकऱ्यांना वेठीस धरून वीज बिल वसुली सुरू केली आहे. एकाचवेळी वीस ते तीस डीपी बंद करून वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. परिणामी रब्बी पेरणीसह फळे व भाजीपाला पिके धोक्यात आल्याने शेतकरी मेटाकुटीला आले होते.
या अनागोंदी कारभारामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी शुक्रवारी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर रुमणे मोर्चा काढण्याचा निर्णय घेऊन वीज पुरवठा सुरळीत करणे, बंद केलेल्या डीपी तातडीने सुरू करणे, सक्तीची वीज बिल वसुली बंद करणे, नादुरुस्त डीपी तातडीने सुरू करणे आदी मागण्या करण्यात आल्या.
यानंतर अर्धापूर विभागाचे उपकार्यकारी अभियंता अविनाश रामगिरवार यांनी शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळास चर्चेसाठी बोलावले. यावेळी झालेल्या बैठकीत शिवसेनातालुका उपप्रमुख सदाशिव इंगळे, नागोराव भांगे पाटील, ऍड. रविकिरण शिंदे, लक्ष्मीकांत मुळे, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष हनुमंत राजेगोरे, शेतकऱ्यांच्या व्यथा मांडली
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.