Amravati News मार्च व एप्रिलमध्ये झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने (Hailstorm) झालेल्या नुकसान भरपाईसाठी जिल्हा प्रशासनाने एकूण ५ कोटी २८ लाख रुपयांच्या अनुदानाची (Subsidy) मागणी शासनाकडे केली आहे. यातील २ कोटी ३८ लाख रुपयांचे अनुदान मंजूर झाले असले तरी ते अद्याप अप्राप्त आहे.
१६ ते १९ मार्च दरम्यान जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने १३६९ हेक्टर क्षेत्र बाधित झाले, त्याचा २६६३ शेतकऱ्यांना फटका बसला. पीक कापणीच्या वेळीच संकट आल्याने नुकसान झाले. जिल्हा प्रशासनाने पंचनामे करून २ कोटी ३८ लाख ५३ हजार ६३० रुपये अनुदानाची मागणी नोंदविली. शासनाने हा निधी मंजूर केला आहे. मात्र अद्याप ही रक्कम प्राप्त झाली नाही.
३१ मार्चला पुन्हा अवकाळी पाऊस व गारपिटीचा तडाखा जिल्ह्यातील धारणी तालुक्यास बसला. ९२७ हेक्टर शेतकऱ्यांची ७४२ हेक्टर शेतजमीन बाधित झाली. पुन्हा पंचनामे करून १ कोटी २६ लाखांचे अनुदान नुकसान भरपाईसाठी मागण्यात आले.
७ एप्रिलला अमरावती, भातकुली, तिवसा, नांदगाव खंडेश्वर, दर्यापूर, अंजनगावसुर्जी या सहा तालुक्यात अवकाळी पाऊस व गारपिटीने धुमाकूळ घालत ८८४ हेक्टरवर नुकसान केले. १६८७ शेतकरी यामुळे बाधित झाले. त्यांना नुकसान भरपाईसाठी १ कोटी रुपयांच्या अनुदानाची मागणी शासनदप्तरी नोंदविण्यात आली.
मनुष्यहानीच्या नुकसानीसाठी ६.४३ कोटी
१६ मार्चपासून जिल्ह्यात सात वेळा वादळी पाऊस व वीज पडण्याच्या घटना अवकाळी पावसासोबत घडल्या आहेत. त्यापोटी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे ६ कोटी ४३ लाख रुपयांच्या अनुदानाचा प्रस्ताव पाठविला आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.