झालावार, राजस्थान (वृत्तसंस्था) ः राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांनी सोमवारी (ता. ५) मुख्य प्रवाहातील राष्ट्रीय माध्यमांवर टीका केली. संपादक आणि मालक दबावाखाली असल्याने या माध्यमांनी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या भारत जोडो यात्रेवर (Bharat Jodo Yatra) ‘बहिष्कार’ टाकला, असा आरोप त्यांनी केला.
भारत जोडो यात्रेने काँग्रेसशासित राज्यात प्रवेश केल्यानंतर एका दिवसानंतर येथे पत्रकार परिषदेला संबोधित करताना गेहलोत म्हणाले की, लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून त्यांची जबाबदारी पार पाडण्यात माध्यमे पूर्णपणे अपयशी ठरली आहेत आणि त्यासाठी इतिहास त्यांना माफ करणार नाही.
गेहलोत प्रसारमाध्यमांवर टीका करताना, म्हणाले की या यात्रेला देशभरातून आणि समाज माध्यमांवर प्रचंड पाठिंबा मिळत आहे. माझा आरोप आहे की मुख्य प्रवाहातील माध्यमांनी यात्रेवर बहिष्कार टाकला आहे. लाखो लोक त्यात सामील होत आहेत. पण राष्ट्रीय प्रसारमाध्यमे त्याला साथ देत नाहीत. याचा अर्थ ज्या समाजकारणासाठी मीडिया अस्तित्वात आहे त्याच्याशी त्यांचा काहीही संबंध नाही.
हा चौथा स्तंभ आहे. त्याचे स्वतःचे महत्त्व आहे. काय घडले ते सांगणे हे माध्यमांचे कर्तव्य आहे. एखादी दुर्घटना घडली की तुम्ही त्यावर कव्हर करता. राहुल गांधी सकारात्मक विचाराने पदयात्रा करत आहेत, ही एक सकारात्मक यात्रा आहे. यात कोणतीही हिंसा नाही, द्वेष नाही. तुम्ही तुमचे कर्तव्य करा आणि तुमचे कव्हरेज (तुमच्या कार्यालयात) पाठवा...पण मालक आणि संपादक दबावाखाली आहेत. मी आरोप करतो की त्यांनी इतक्या मोठ्या मोर्चावर बहिष्कार टाकला.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.