
दौंड : गेली काही वर्षे बंद असलेला दौड तालुक्यातील पाटस येथील भीमा साखर कारखाना आजपासून (ता.१५) सुरू होत आहे. प्रत्यक्षात कारखान्याच्या गव्हाणीत मोळी टाकून सुरू होत असल्याने तालुक्यात आनंदाचे वातावरण आहे.
भीमा साखर कारखाना गेली चार वर्षे बंद होता. कारखाना सुरू होईल, की नाही याबाबत सातत्याने चर्चा होत होती. भीमा पाटस कारखाना बंद झाल्याने सभासद शेतकरी, कामगार, ऊसतोड मजूर, ट्रॅक्टरचालक यांचे नुकसान झाले होते. यासह पाटस येथील बाजार पेठेवरही परिणाम झाला होता. कामगारांची घडी विस्कटली होती. अनेक कामगार उदरनिर्वाहासाठी इतरत्र मजुरी करीत होते. अखेर भीमा साखर कारखान्याचे अध्यक्ष आमदार राहुल कुल याच्या अथक प्रयत्न आणि पाठपुराव्यामुळे कारखाना सुरू होत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी असलेले आमदार कुल यांचे निकटचे संबंध, मदत व मार्गदर्शनामुळे श्री. कुल कारखाना सुरू करण्यात यशस्वी झाले आहेत. गेली चार वर्षे बंद असलेला भीमा कारखाना पुन्हा सुरू होत असल्यामुळे सभासद शेतकरी, कामगार, ऊसतोड मंज मजूर, ट्रॅक्टरचालक आणि कारखान्यावर अवलंबून असणारे सर्वच घटक समाधान व्यक्त करीत आहे.
कोट
भीमा कारखाना ज्या ग्रुपने चालवायला घेतला, त्या निराणी ग्रुपचे संगमेश निराणी यांनी भीमा कारखान्याचे अध्यक्ष आमदार राहुल कुल आणि कामगार यांची बैठक घेतली. या बैठकीतील निर्णयामुळे कामगार आनंदात आहेत.
- अर्जुन दिवेकर, अध्यक्ष, भीमा कामगार संघ, पाटस
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.