
Union Budget 2023 : "या अर्थसंकल्पात (Union Budget 2023) गरीब, मध्यमवर्गीय, शेतकरी (Farmer) आणि युवा वर्गाचा विचार आहे. पुढील २५ वर्षांच्या विकसित भारताचे प्रतिबिंब आहे. शेतीक्षेत्रात मोठी गुंतवणूक होत असून नैसर्गिक शेतीवरील (Natural Agricultural) भर महत्त्वाचा आहे." अशी प्रतिक्रिया केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांनी दिली आहे.
एक कोटी शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीकडे वळविणे म्हणजे नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून शेतीचा नाश रोखण्यासाठी टाकलेले पाऊल आहे. जलवायुपरिवर्तनावरील प्रभाव थांबविण्याचा प्रयत्न आहे. या अर्थसंकल्पात सबसिडीपलीकडील विचार केला आहे.
डिजिटल आणि तंत्रज्ञानाचा वापर शेतीत करण्याच्या दृष्टीने या अर्थसंकल्पात विचार केला आहे. सहकार क्षेत्राला महत्त्व दिले आहे. विकास संस्थांना मल्टिपर्पज सोसायट्यांचा दर्जा मिळत आहे. गावपातळीवर आता सहकार मजबूत होईल.
२० प्रकारच्या योजनांमध्ये प्राथमिकता मिळेल. विकास संस्था कोल्ड स्टोरेजपासून पेट्रोल पंपांपर्यंतचे व्यवसाय करू शकतील. साखर कारखान्यांचा १० हजार कोटींचा प्राप्तिकर भरावा लागणार नाही. त्यामुळे साखर उद्योगाला बूस्ट मिळत आहे.
देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.