
Cashew Crop Damage सिंधुदुर्गनगरी ः गेल्या दोन-तीन दिवसांपासून जिल्ह्याच्या काही भागांत सुरू असलेल्या जोरदार वाऱ्याचा काजू पिकाला मोठा (Cashew Crop) फटका बसला आहे.
वाऱ्यामुळे काजूची कोवळी बी आणि मोहोर गळून पडला आहे. जिल्ह्याच्या पूर्वपट्ट्यातील अनेक गावांमध्ये हा प्रकार घडला आहे. बागायतदारांचे मोठे नुकसान झाले आहे.
जिल्ह्यात काजू हंगामाला नुकतीच सुरुवात झाली आहे. अनेक भागांत अजूनही काजू हंगाम सुरू झालेला नाही. बहुतांश ठिकाणी काजूवर मोहोर आणि कोवळी काजू बी दिसून येत आहे.
दोडामार्ग, सावंतवाडी, मालवण, वेंगुर्ला तालुक्यांमध्ये काजू परिपक्व होण्यास सुरुवात झाली आहे. परंतु पूर्वपट्ट्यात काही दिवस उशिराने काजू बी तयार होतात. जिल्ह्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून जोरदार वारे वाहत आहे.
जिल्ह्याच्या पूर्वपट्ट्यात या वाऱ्याचे प्रमाण अधिक आहे. पहाटे तीन-चार वाजल्यापासून जोरदार वारे सुरू होतात. गेले दोन दिवस या वाऱ्यांनी हैराण केले आहे.
काजू पिकाला त्यांचा सर्वाधिक फटका बसला आहे. झाडावरील कोवळी काजू बी आणि मोहोर, झाडांची पाने गळून पडली आहेत.
झाडांखाली हिरव्या पानांचा खच साचला आहे. त्याचा उत्पादनावर विपरीत परिणाम होणार आहे. पूर्वपट्ट्यात काजू पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.
त्या तुलनेत किनारपट्टी भागात नुकसानीची तीव्रता कमी आहे. गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत शनिवारी (ता. ४) सकाळपासून वाऱ्याचा वेग काहीसा कमी झाला आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.