
Latest Agriculture News शेतकऱ्यांचे प्रश्न (Farmers Issue) समजून घेण्यासाठी मंगळवारी (ता. ९) दुपारी ३ वाजता मुख्यमंत्र्यांनी सह्याद्री अतिथिगृह येथे बैठक आयोजित केली आहे.
त्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetti), किसान जिहादीचे विनायकराव पाटील, शेतकरी वारकरी संघटनेचे सिकंदर शहा, कराडचे पंजाबराव पाटील आदींना आमंत्रित केले आहे.
या बैठकीसंदर्भातील पत्र राज्य शासनाचे कार्यासीन अधिकारी अ. ज्ञा. लांडगे यांनी काढले आहे. या बैठकीला राज्यातील महत्त्वाचे पदाधिकारी तसेच अधिकारी उपस्थित राहतील.
‘‘मागील वर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे त्यांनी कर्जाची परतफेड केली नाही. या कारणाने त्यांना कर्ज मिळण्याची शक्यता नाही. त्यामुळे खरीप हंगामात शेतकऱ्यांना सरकारने आर्थिक मदत करावी.
नियमित कर्जफेडणाऱ्यांना महात्मा जोतीराव फुले कर्ज मुक्ती योजनेचे प्रोत्साहनपर ५० हजार रुपये अनुदान अजूनही शेतकऱ्यांना मिळालेले नाही. याशिवाय तेलंगणा राज्याप्रमाणे छोटी बॅरेज बांधून राज्यातील सिंचन क्षेत्र वाढवावे. शेतीसाठी दिवसा वीज आवश्यक आहे. या संदर्भातील मागण्या या बैठकीत करू,’’ असे शहा यांनी सांगितले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.